शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

वनाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:46 IST

मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे.

ठळक मुद्दे महेंद्रकुमार मोहबंशी यांचे प्रतिपादन : कुरखेडा येथे जागतिक वन दिन साजरा

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे. या युगातही जंगल, दऱ्याखोऱ्यात निवास करणाऱ्या नागरिकांची उपजीविका ही वृक्षावर अवलंबून असते. वृक्षांचा कत्तलीमुळे पर्यावरणालासुद्धा मोठी हानी पोहोचून आरोग्याची समस्या गंभीर होत आहे. भविष्याच्या सुरक्षेकरिता वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केले.जागतिक वन दिनानिमित्त वन परीक्षेत्र कार्यालय कुरखेडा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य चांगदेव फाये, न. पं. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, उपसरपंच राजन खुणे, पोलीस पाटील नारायण टेंभुर्णे, पत्रकार सिराज पठाण, क्षेत्रसहायक एस. बी. कायते, पशुवैद्यकीय अधिकारी सोनार, प्राचार्य भरणे, सानिया मंगर, डी. आर. मल्लेलवार, डी. जे. हेपट, गांगरेड्डीवार, माणिक राऊत उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. मोहबंशी म्हणाले, वनाचे संरक्षण वृक्षांची लागवड व संगोपन याला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांनी जबाबदारी स्वीकारावी. इतर लोकांनाही या मोहिमेत जोडण्याचा प्रयत्न करावा, तेव्हाच वनांचे संरक्षण होईल.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. तत्पूर्वी वन विभागाच्या वतीने शहरात ढोल ताशा व भजनासह वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला. प्रास्ताविक वन परिक्षेत्र अधिकारी डोंगरवार, संचालन क्षेत्रसहायक प्रकाश भडांगे तर आभार वनरक्षक धात्रक यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.