शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

मानवाच्या रक्षणार्थ पर्यावरण संवर्धनाची गरज

By admin | Updated: June 6, 2017 00:48 IST

पर्यावरण व मानवी जीवन यांचा सहसंबंध आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जिवाला धोका होण्याची शक्यता आहे.

जागतिक पर्यावरण दिन : कुरखेडात मान्यवरांचा सूरलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : पर्यावरण व मानवी जीवन यांचा सहसंबंध आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जिवाला धोका होण्याची शक्यता आहे. मानवी जीवनाच्या सुखासाठी पर्यावरणाचे रक्षण होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आहे, असा सूर मान्यवरांनी सोमवारी कुरखेडा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात काढला. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सहायक वन संरक्षक दीपक चौडीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, जि. प. सदस्य प्रल्हाद कराडे, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, पं. स. उपसभापती मनोज दुनेदार, पं. स. सदस्य संध्या नैताम, शारदा पोरेटी, विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, राम लांजेवार, चांगदेव फाये, न. पं. सभापती आशा तुलावी, रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, शाहेदा मुघल, चित्रा गजभिये, राजन खुणे, नारायण टेंभुर्णे, बंडू लांजेवार, सरपंच शशिकला कुमरे, तुलसी उईके, सहायक वनसंरक्षक कैदलवार, सेवानिवृत्त सहायक वन संरक्षक बावनकर उपस्थित होते. सर्वप्रथम वन परिक्षेत्र अधिकारी शंकर गाजलवार व संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशा तुलावी यांच्या नेतृत्त्वात शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात वाकडी येथील दारूबंदी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वन व कर्मचाऱ्यांचाही सत्कार झाला. वृक्षांना कौटुंबिक सदस्याप्रमाणे समजून त्यांचे जतन करावे, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले. अवैैध वृक्षतोडीमुळे वन क्षेत्राचे प्रमाण कमी होत आहे. प्राणी गावाकडे धाव घेत असल्याने जंगलाचे रक्षण करावे, असे आवाहन नाना नाकाडे यांनी केले. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी वृक्ष लागवड व संवर्धन ही मनुष्याची नैैतिक जबाबदारी आहे. परंतु तो जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येते, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष मोहबंसी, जि. प. सदस्य कराडे, उपसभापती दुनेदार व सहायक वनसंरक्षक चौडीकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वन परिक्षेत्राधिकारी गाजलवार, संचालन वनरक्षक गाजी शेख तर आभार क्षेत्र सहायक भडांगे यांनी मानले. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.