शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी दहशतीने केला गावकऱ्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

गजामेंढी येथील नागरिकांनी सांगितले की, टिपागड दलमचा नक्षलवादी सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नक्षलवादी नवलुराम तुलावी व प्लाटून क्र. ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह जवळपास २० नक्षलवादी २० मे रोजी गावात आले. गावकऱ्यांकडून जबरजस्तीने पैसे व धान्य गोळा करून जंगलात गेले. काही वेळानंतर पुन्हा गावात येऊन आमच्यासोबत जंगलात या, अशी तंबी गावकऱ्यांना दिली.

ठळक मुद्देगजामेंढीवासीयांनी सांगितली आपबिती; नारेबाजी करत जाळले नक्षल बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील गजामेंढी गावाजवळ २० मे रोजी नक्षलवाद्यांनी चार वाहनांना आग लावली. दोन्ही बाजूने झाडे पाडण्यासाठी नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांचा वापर केला, अशी माहिती गजामेंढीवासीयांनी दिली. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा नागरिकांनी २३ मे रोजी नक्षल बॅनर जाळून निषेध केला.गजामेंढी येथील नागरिकांनी सांगितले की, टिपागड दलमचा नक्षलवादी सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नक्षलवादी नवलुराम तुलावी व प्लाटून क्र. ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह जवळपास २० नक्षलवादी २० मे रोजी गावात आले. गावकऱ्यांकडून जबरजस्तीने पैसे व धान्य गोळा करून जंगलात गेले. काही वेळानंतर पुन्हा गावात येऊन आमच्यासोबत जंगलात या, अशी तंबी गावकऱ्यांना दिली. जो त्यांच्यासोबत येणार नाही त्याला बंदूकीचा धाक दाखविण्यात आला. त्यामुळे एकही जण नक्षलवाद्यांना विरोध करू शकला नाही. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गावकरी सावरगाव-मुरूमगाव मुख्य मार्गावर आले. नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभे करून पोलीस आल्यास माहिती देण्यास सांगीतले. त्यानंतर झाडे तोडून ४ वाहनांना आग लावली. नक्षलवाद्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी आमचा ढालीसारखा वापर केला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिला. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा गावकऱ्यांनी २३ मे रोजी निषेध केला. बंदुकीचा धाक दाखविणारे आमचे कैवारी होऊच शकत नाही. नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे दुर्गम व आदिवासी भागाचा विकास रखडला आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे बॅनर जाळले. तसेच नक्षलवाद्यांनी जाळलेली वाहने पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या बाजुला केली.नक्षलवाद्यांच्या आमिषांना बळी पडू नकागजामेंढी येथील गावकºयांनी दाखविलेल्या हिमतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले. तेलगू नक्षलवाद्यांच्या खोट्या आमिशाला स्थानिक आदिवासी नागरिकांनी बळी पडू नये. आजपर्यंत ज्या नक्षलवाद्यांनी पोलिसांमसोर आत्मसमर्पण केले आहे, ते सुखी व समाधानी जीवन जगत आहेत. नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांनीही नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला जाईल, असे आवाहन एसपींनी केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी