शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

२२ ग्रामपंचायतींचा नक्षल गावबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतराचा नियम पाळून ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे, कोणत्याही प्रकारची त्यांना मदत न करण्याचे ठरविले. याशिवाय प्रशासनाने किष्टापूर नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरू ठेवून हे काम लवकर पूर्ण करावे, असे ठरावात म्हटले आहे.

ठळक मुद्देप्रोत्साहन अनुदान : देचलीपेठा भागात नक्षल्यांविरूद्ध ग्रामस्थांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ८ एप्रिल २०२० रोजी अहेरी तालुक्यातील किष्टापूर नजीकच्या नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला विरोध करत नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराची वाहने जाळली होती. या कृत्याचा पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींनी तीव्र निषेध नोंदविला होता. आता देचलीपेठा पंचक्रोशीतील २२ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन नक्षल गावबंदीचा ठराव एकमताने मंजूर करत नक्षली कारवायांना स्पष्ट विरोध दर्शविला आहे.विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतराचा नियम पाळून ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे, कोणत्याही प्रकारची त्यांना मदत न करण्याचे ठरविले. याशिवाय प्रशासनाने किष्टापूर नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरू ठेवून हे काम लवकर पूर्ण करावे, असे ठरावात म्हटले आहे. सदर पुलाच्या बांधकामासाठी ग्रामस्थ स्वत: पुढाकार घेत प्रशासनाला मदत करतील, अशी ग्वाहीही ठरावातून देण्यात आली. स्वत:च्या फायद्यासाठी जनतेचा वापर करून घेणे नक्षलवाद्यांनी तत्काळ थांबवावे व जनतेच्या विकासाच्या आड येऊ नये, असा इशाराही या २२ ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना दिला आहे. नक्षल गावबंदीचे ठराव संमत करणाऱ्या १६ ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार आहे. महाराष्टÑ शासनाच्या निर्णयानुसार सदर गावांच्या विकासासाठी प्रत्येकी सहा लाख रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून मंजूर करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. नक्षल गावबंदीचे ठराव पारित करणाºया गावांमधील ग्रामस्थांच्या कृतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वागत केले.पूल बांधकामासाठी ग्रामस्थ आग्रहीकिष्टापूर नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा फायदा देचलीपेठा परिसरातील हजारो ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणार आहे. याची जाणीव या भागातील नागरिकांना आहे. पावसाळ्यात सदर नाल्याला पूर आल्यानंतर या भागातील गावांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी शालेय विद्यार्थी, मजूर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आदींची दळणवळण व्यवस्था पूर्णत: बंद होते. उपचाराअभावी नागरिकांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. या सर्व बाबींचा विचार करता किष्टापूर नाल्यावर पुलाचे बांधकाम होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हे बांधकाम पूर्ण करून घेण्यासाठी या भागातील नागरिकही कमालीचे आग्रही आहेत.पुलाचे काम पूर्ण होईलच- बलकवडेनक्षलवाद्यांनी किष्टापूर नाल्याच्या पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर सदर पुलाचे काम बंद पडले. देचलीपेठा परिसरातील २२ ग्रामपंचायतींनी नक्षल गावबंदीचा ठराव केल्याने अशा गावांच्या विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव पाठीशी राहील. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पोलीस दल पूर्ण प्रयत्न करेल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ग्रामस्थांना दिले.गावबंदीसाठी या गावांचा पुढाकारनक्षलवाद्यांनी कोणत्याही बाबीचा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी किष्टापूर नाल्याच्या पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये नक्षल्यांप्रती आजही असंतोष आहे. त्यामुळे देचलीपेठा परिसरातील दोडगीर, शेडा, आसली, मुखनपल्ली, बिºहाडघाट, कोंजेड, येलाराम, कामासूर, मुत्तापूर, तोडका, मिट्टीगुडम, पेठा, जोगनगुडा, कोडसापल्ली, देचलीपेठा, सिंधा, किष्टापूर, पेरकाभट्टी, दोडगीर, पत्तीगाव, लखनगुडा, शेडा आदी २२ ग्रामपंचायतींनी नक्षल गावबंदीचा ठराव पारित केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी