शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

परीक्षेसाठी मुंबईची वारी

By admin | Updated: July 8, 2017 01:07 IST

राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जात असलेल्या पुरवठा निरिक्षक या पदासाठी अनेक जिल्ह्यांना विभागीय स्तरावरील ठिकाण हे परीक्षा केंद्र दिले आहे.

पुरवठा निरीक्षकपदाची परीक्षा : गडचिरोली व चंद्रपूरसाठी दिले मुंबईचे केंद्र! लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जात असलेल्या पुरवठा निरिक्षक या पदासाठी अनेक जिल्ह्यांना विभागीय स्तरावरील ठिकाण हे परीक्षा केंद्र दिले आहे. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना मुंबई येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. अनेक गरीब उमेदवार मुंबईला जाण्याचा खर्च करू शकणार नसल्यामुळे सदर उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर परीक्षा केंद्र रद्द करून नागपूर विभागातीलच परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. नागपूर आयुक्त कार्यालयाने २४ मे रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून पुरवठा निरिक्षक या पदासाठी अर्ज मागविले होते. जाहिरातीनुसार परीक्षा केंद्र विभागीयस्तरावर निश्चित करण्यात आले होते व परीक्षार्थी अधिक झाल्यास सदर परीक्षा केंद्र जिल्हास्तरावर घेण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. जाहिरातीतील अटी व शर्तींची पूर्तता करून गडचिरोली जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक परीक्षार्थींनी या पदासाठी अर्ज केले आहेत. या पदाची परीक्षा २३ जुलै रोजी होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाने प्रसिध्दी पत्रक प्रकाशित केले असून त्यामध्ये गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मुंबई येथे परीक्षा केंद्र दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर मुंबई व गडचिरोली जिल्हे आहेत. दोन दिवस अगोदर निघून दोन दिवसानंतर सदर विद्यार्थी आपल्या गावी परतणार आहेत. परीक्षेच्या एक दिवस अगोदर मुंबई येथे पोहोचल्याने तेथील लॉजचा खर्चही विद्यार्थ्याला करावा लागणार आहे. येथील गरीब विद्यार्थी कसेतरी आवेदनपत्र भरतात. त्यातही आता मुंबई येथे जाण्याचा खर्च करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मुंबई येथे जाऊन परीक्षाच देऊ शकणार नाही. विशेष म्हणजे गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील युवकांची त्यांच्याच विभागस्तरावर परीक्षा ठेवली आहे. मग गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांवरच हा अन्याय का? असा सवाल बेरोजगारांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून हे परीक्षा केंद्र रद्द करावे, अशी मागणी युवकांनी केली आहे. निवेदन देतेवेळी संतोष बोलुवार, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, भास्कर बुर्रे, भुपेश कुळमेथे, प्रविण वाघरे आदी उपस्थित होते. शिक्षक पात्रता परीक्षेनेही गोंधळ २३ जुलै रोजी पुरवठा निरिक्षक पदासाठी परीक्षा ठेवण्यात आली आहे. तत्पूर्वी २२ जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा ठेवली आहे. याही परीक्षेला जिल्ह्यातून हजारो उमेदवार बसले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा देऊन त्याच दिवशी मुंबईला पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे अनेक युवक दोन पैकी एकच परीक्षा देऊ शकणार आहेत. खर्चामुळे पुरवठा निरिक्षक पदाच्या परीक्षेपासूनच उमेदवार वंचित राहण्याची शक्यता आहे. नोकरीच्या दृष्टीने पुरवठा निरिक्षक पदाची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या परीक्षेचे केंद्र बदलविण्याची मागणी आहे.