शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

दीड महिना टंचाईचे सावट

By admin | Updated: February 13, 2016 00:50 IST

वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खोल गेली असून नळ योजनेच्या नदी पात्रातील इनटेक वेल व जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

गडचिरोलीकर त्रस्त : न.प. प्रशासनाच्या लेटलतिफ कारभाराचा फटकागडचिरोली : वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खोल गेली असून नळ योजनेच्या नदी पात्रातील इनटेक वेल व जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ८ जानेवारीपासून पालिकेच्या वतीने दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. या कामाची निविदा विलंबाने काढण्यात आली असून सदर काम करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी दीड महिना गडचिरोली शहरात पाणी टंचाई जाणवणार आहे.गेल्या महिनाभरापासून पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरातील सर्व वार्डात दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जे कुटुंबधारक केवळ नळ पाणी योजनेच्या भरवशावर आहेत, त्यांची प्रचंड पंचाईत होत आहे. महिनाभरापूर्वी सदर समस्या निर्माण झाली. मात्र नगर परिषद प्रशासनाने सदर समस्या मार्गी लावण्यासाठी गतीने कार्यवाही केली नाही. दोन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनामार्फत इनटेकवेल व जॅकवेलमधील साचलेला गाळ साफ करणे, पोकलँड मशीनने नदीपात्र खोल करणे, सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधणे, तसेच इनटेकवेलवर लोखंडाचे कुंपण तयार करणे या कामाची निविदा काढण्यात आली. सदर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिकेला पुन्हा आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर संबंधित कंत्राटदारास कामाचे आदेश देण्यात येईल. जवळपास १ मार्चपासून सदर काम सुरू होण्याची शक्यता आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गडचिरोली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व पुरेशा प्रमाणात होण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यात पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीसाठी कंत्राटदार मिळेनाशहरातील सर्वच २३ वार्डात अनेक ठिकाणी नळ पाईपलाईन लिकेज होते. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तर काही कुटुंबांना मुळीच पाणी मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामाची निविदा काढण्यात आली. मात्र या कामासाठी शहरातील एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. न.प. प्रशासनामार्फत सदर निविदेत नळ पाईपलाईन लिकेज झाल्याची माहिती मिळताच पाच दिवसाच्या आत संबंधित कंत्राटदाराला दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा लागेल, अन्यथा पाच दिवसानंतर प्रती दिवस ५०० रूपये दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येईल, ही अट ठेवण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराने नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामाकडे पाठ फिरविली आहे.एक महिन्यानंतर काढली निविदानदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून इनटेक व जॅकवेलमध्ये गाळ साचल्याने ८ फेब्रुवारीपासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मात्र तेव्हापासून पालिका प्रशासनाने सदर समस्या मार्गी काढण्यासाठी कोणतेही पाऊले उचलली नाही. तब्बल महिनाभरानंतर पालिका प्रशासनाने या कामाची निविदा काढली आहे. पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शहरातील नागरिक न.प.प्रती रोष व्यक्त करीत आहेत.