शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

दीड महिना टंचाईचे सावट

By admin | Updated: February 13, 2016 00:50 IST

वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खोल गेली असून नळ योजनेच्या नदी पात्रातील इनटेक वेल व जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

गडचिरोलीकर त्रस्त : न.प. प्रशासनाच्या लेटलतिफ कारभाराचा फटकागडचिरोली : वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खोल गेली असून नळ योजनेच्या नदी पात्रातील इनटेक वेल व जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ८ जानेवारीपासून पालिकेच्या वतीने दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. या कामाची निविदा विलंबाने काढण्यात आली असून सदर काम करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी दीड महिना गडचिरोली शहरात पाणी टंचाई जाणवणार आहे.गेल्या महिनाभरापासून पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरातील सर्व वार्डात दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जे कुटुंबधारक केवळ नळ पाणी योजनेच्या भरवशावर आहेत, त्यांची प्रचंड पंचाईत होत आहे. महिनाभरापूर्वी सदर समस्या निर्माण झाली. मात्र नगर परिषद प्रशासनाने सदर समस्या मार्गी लावण्यासाठी गतीने कार्यवाही केली नाही. दोन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनामार्फत इनटेकवेल व जॅकवेलमधील साचलेला गाळ साफ करणे, पोकलँड मशीनने नदीपात्र खोल करणे, सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधणे, तसेच इनटेकवेलवर लोखंडाचे कुंपण तयार करणे या कामाची निविदा काढण्यात आली. सदर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिकेला पुन्हा आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर संबंधित कंत्राटदारास कामाचे आदेश देण्यात येईल. जवळपास १ मार्चपासून सदर काम सुरू होण्याची शक्यता आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गडचिरोली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व पुरेशा प्रमाणात होण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यात पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीसाठी कंत्राटदार मिळेनाशहरातील सर्वच २३ वार्डात अनेक ठिकाणी नळ पाईपलाईन लिकेज होते. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तर काही कुटुंबांना मुळीच पाणी मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामाची निविदा काढण्यात आली. मात्र या कामासाठी शहरातील एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. न.प. प्रशासनामार्फत सदर निविदेत नळ पाईपलाईन लिकेज झाल्याची माहिती मिळताच पाच दिवसाच्या आत संबंधित कंत्राटदाराला दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा लागेल, अन्यथा पाच दिवसानंतर प्रती दिवस ५०० रूपये दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येईल, ही अट ठेवण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराने नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामाकडे पाठ फिरविली आहे.एक महिन्यानंतर काढली निविदानदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून इनटेक व जॅकवेलमध्ये गाळ साचल्याने ८ फेब्रुवारीपासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मात्र तेव्हापासून पालिका प्रशासनाने सदर समस्या मार्गी काढण्यासाठी कोणतेही पाऊले उचलली नाही. तब्बल महिनाभरानंतर पालिका प्रशासनाने या कामाची निविदा काढली आहे. पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शहरातील नागरिक न.प.प्रती रोष व्यक्त करीत आहेत.