दाेन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाेहखनिज उत्खननाचे काम सुरू हाेते. मात्र, लाेहखनिजाच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने पाच नागरिक ठार झाले हाेेते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी माेठे आंदाेलन केले. तेव्हापासून लाेहखनिजाचे उत्खनन बंद ठेवण्यात आले हाेते. लाेहखनिजाच्या ट्रकमुळे रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. त्यामुळे अपघात झाला हाेता. आताही रस्ता त्याच स्थितीत असताना पुन्हा खाेदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पहाडावर प्रथमच निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगार तिथेच मुक्कामी राहून काम करीत आहेत. मुख्य कंपनी लाॅयड मेटल्स आहे. आता हे काम ओडिशा राज्यातील त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीला देण्यात आले आहे. काम करणारे सर्वच मजूर परप्रांतीय आहेत. त्यामुळे येथील नक्षल परिस्थितीविषयी ते अवगत नसावेत. अल्फा नामक कंपनी स्थानिक मजुरांकडुन अनेक जाचक अटी लिखित स्वरूपात घेऊन सेक्युरिटीच्या जागा भरत आहे. तीन कंपन्यांचे काम असल्याने अनेकजण गोंधळात आहेत. ज्या कंपनीला शासनाने लीज दिली, त्याच कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, अशी मागणी होत आहे.
पूर्वी रस्ता, नंतरच लाेहखनिजाची वाहतूक करा, अन्यथा तीव्र आंदाेलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.