शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गडचिराेलीतील नळांना लागणार मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST

गडचिराेली: गडचिराेली शहरातील प्रत्येक नळाला पाणी माेजमाप करणारे मीटर लावले जाणार आहे. याची निविदा काढण्यात आली असून महिनाभरात प्रत्यक्ष ...

गडचिराेली: गडचिराेली शहरातील प्रत्येक नळाला पाणी माेजमाप करणारे मीटर लावले जाणार आहे. याची निविदा काढण्यात आली असून महिनाभरात प्रत्यक्ष मीटर लावण्याच्या कामाला सुरुवात हाेणार आहे. जेवढा पाणी वापर तेवढे पैसे माेजावे लागणार असल्याने पाण्याची बचत हाेण्यास फार माेठी मदत हाेणार आहे.

गडचिराेली शहरातील नळांना पाणी माेजमाप मीटर लावण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून नगर परिषदेमार्फत प्रयत्न केले जात हाेते. मात्र निधी नसल्याने हा प्लान पुढे ढकलला जात हाेता. अखेर नगर परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नगराेत्थान याेजनेतून तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून शहरात आता नळांना मीटर लावले जाणार आहेत. २ काेटी ९१ लाख ३३ हजार ३१० रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. नागपूर येथील वाॅटरसी साेल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम मिळाले आहे. शुक्रवारी नगर परिषदेची विशेष सभा पार पडली. या सभेत निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नगर परिषदेमार्फत कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जाऊन महिनाभरात कामाला सुरुवात हाेणार आहे.

बाॅक्स

बालटीभर पाण्यासाठी माेजावे लागणार २० पैसे

-राज्यातील बहुतांश माेठ्या शहरांमध्ये नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. यात आता गडचिराेली शहराचाही समावेश हाेणार आहे. ज्या शहरांमध्ये मीटर लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रती लिटर १ पैसा शुल्क आकारले जात आहे. जवळपास तेवढाच दर गडचिराेली शहरातही आकारला जाण्याची शक्यता आहे. एक बकेट जवळपास २० लिटरची राहते. तेवढे पाणी नळातून घेतल्यास २० पैसे बिलात जाेडले जाणार आहेत.

- आता वर्षाला सरसकट प्रती जाेडणी दीड हजार रुपये आकारले जात आहेत. यापुढे लाईट बिलाप्रमाणचे रीडिंग करून बिल आकारले जाईल. यात तीन, चार किंवा सहा महिन्यांनी बिल आकारले जाईल.

- बांधकाम किंवा अवैध कामासाठी पाण्याचा वापर हाेत असल्यास नगर परिषद दंड म्हणून संबंधित पाण्याचा दर त्या ग्राहकासाठी वाढवू शकते.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

नळांना लागणार आपाेआप ताेट्या

-नगर परिषदेने अनेकवेळा कारवाई करूनही नळधारक नळांना ताेट्या लावत नव्हते. त्यामुळे हजाराे लिटर पाणी वाया जात हाेते. पाणी कितीही वापरा बिल तेवढेच असल्याने नळधारक ताेट्या लावण्याकडे दुर्लक्ष करीत हाेते. आता मात्र ताेट्या लावल्याशिवाय पर्याय नाही.

- अनेक नळधारक दुसऱ्या मजल्यावर पाणी चढविण्यासाठी टिल्लू पंप लावत हाेते. आता टिल्लूपंपाचा वापर बंद हाेईल. एखादा व्यक्ती टिल्लूपंप लावत असेल तर त्याला पाण्याच्या वापरएवढे बिल द्यावे लागणार आहे.

-जे नागरिक पाण्याचा वापर कमी करतील त्यांना मात्र कमी बिल येऊन त्यांच्या पैशांची बचत हाेईल.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

सहा टप्प्यांमध्ये हाेणार काम

-नळांना मीटर लावण्यासाठी शहराचे सहा झाेन पाडण्यात आले आहेत. त्यात टप्प्याटप्प्याने मीटर लावले जाणार आहेत. संपूर्ण शहरात मीटर लावण्यात आल्यानंतर बिलाची आकारणी सुरू हाेईल.

-नगराेत्थान याेजनेतून राज्य शासनाने तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मीटर लावण्याचा खर्च केला जाणार आहे. जवळपास १ हजार ७०० रुपये मीटरची किंमत आहे. तर मीटर बसविण्याचा खर्च व इतर साहित्याचा खर्च जवळपास १ हजार रुपये आहे. या खर्चाचा बाेझा ग्राहकांवर लादला जाणार नाही.

काेट

काही नागरिक नळांना ताेट्या लावत नाही तर काही टिल्लू पंपांचा वापर करतात. टिल्लू पंप लावणाऱ्यांवर व ताेट्या न लावणाऱ्यांवरही नगर परिषदेने कारवाई केली मात्र नागरिकांनी पुन्हा टिल्लू पंप लावले आहेत. त्यामुळे काही नागरिकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी मिळत हाेते. याबाबत तक्रारी वाढल्या हाेत्या. नळांना मीटर बसविण्यासाठीचा प्रस्ताव नगर परिषदेने २०१७ मध्येच राज्यशासनाकडे सादर केला हाेता. त्यासाठी पाठपुरावा सुरू हाेता. मीटर बसल्याने प्रत्येकाला पाणी मिळेल.

- याेगीता पिपरे, नगराध्यक्ष, नगर परिषद, गडचिराेली