शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

नगराध्यक्ष व उपाध्यक्षाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:59 IST

चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

रत्नाकर बोमीडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.गडचिरोली विधानसभा मतदार संघात केवळ चामोर्शी नगर पंचायतीमध्ये काँग्रेसचे पूर्ण बहुमत असतानाही ही नगर पंचायत भाजपाच्या ताब्यात गेली. काँग्रेसचे नेतृत्व कसोटीसह उतरले नाही. या उलट केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने चामोर्शी नगर पंचायतीमध्ये भाजपाला सत्तेत सहभागी करून घेतले. चामोर्शीचा विकास करता येईल. तसेच निधी खेचून आणता येईल, असा डाव टाकून काँग्रेसच्या चार नगरसेवकांना आपल्या खेम्यात घेऊन व राकाँ नगरसेविकेला भाजपात प्रवेश देऊन शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता काबिज करण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले.चामोर्शी शहर अमर्यादीत समस्यांचे माहेरघर आहे. तुंबलेल्या नाल्या ही गंभीर समस्या आहे. पावसाळ्यात व इतर वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्याद्वारे पाणी वाहून जात नाही. तर रस्त्यावर अथवा रस्त्याच्या काठावरील घरात पाणी शिरणे ही नित्याची बाब आहे. भूमिगत गटार नालीचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. कित्येक वार्डात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात नळाद्वारे उपलब्ध होत नाही. अनेक नवीन वस्तींमध्ये रस्ता व नालीचे बांधकाम झाले नाही. जनतेने आपल्या तक्रारी ‘अ‍ॅप’वर टाकून प्रशासनाला कळवाव्या म्हणून हजारो रूपये खर्च करून अ‍ॅप तयार करणारी गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत म्हणून दिंडोरा पिटविल्या गेला. परंतु अ‍ॅपद्वारे एकाही तक्रारीचे निवारण झाले नाही. तसेच तक्रारीही पाहिल्या जात नाही. चामोर्शी येथे स्मशानभूमीची व्यवस्था नाही. स्मशानभूमी नसल्याने कित्येकांची कुचंबणा होत असते. बसस्थानकावरील प्रसाधनगृहाची दयनिय अवस्था आहे. वाढत्या अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. क्रीडासंकूल व बसडेपो, बसस्थानक व अनेक योजनांसाठी लागणाऱ्या शासकीय जागा उपलब्ध असतानाही अतिक्रमणाच्या विळख्यामुळे या योजना शहरात कार्यान्वित होऊ शकल्या नाही. शहरात सुसज्ज नाट्यगृह व सभागृह असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ओपन स्पेसची जागा आहे. त्या वसाहतीत बालोद्यान व उद्यानाची गरज आहे. नगर पंचायतीचे स्वत:चे सुसज्ज वाचनालय असणे शहराचे वैभव असते. परंतु आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. शहराच्या सर्व रस्त्यावर स्वच्छता दिसून येत नाही. केवळ घंटागाडी फिरविल्याने स्वच्छता राहणार नाही. एक हजार कोटीचा निधी आणला तरी शहरातील समस्या सुटतील, असे म्हणता येत नाही. फुले, शाहू, आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे उच्चविद्याविभुषीत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष शहराला लाभले आहे. ते विकासाच्या कसोटीत उतरण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष