शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नगराध्यक्ष व उपाध्यक्षाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:59 IST

चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

रत्नाकर बोमीडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.गडचिरोली विधानसभा मतदार संघात केवळ चामोर्शी नगर पंचायतीमध्ये काँग्रेसचे पूर्ण बहुमत असतानाही ही नगर पंचायत भाजपाच्या ताब्यात गेली. काँग्रेसचे नेतृत्व कसोटीसह उतरले नाही. या उलट केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने चामोर्शी नगर पंचायतीमध्ये भाजपाला सत्तेत सहभागी करून घेतले. चामोर्शीचा विकास करता येईल. तसेच निधी खेचून आणता येईल, असा डाव टाकून काँग्रेसच्या चार नगरसेवकांना आपल्या खेम्यात घेऊन व राकाँ नगरसेविकेला भाजपात प्रवेश देऊन शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता काबिज करण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले.चामोर्शी शहर अमर्यादीत समस्यांचे माहेरघर आहे. तुंबलेल्या नाल्या ही गंभीर समस्या आहे. पावसाळ्यात व इतर वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्याद्वारे पाणी वाहून जात नाही. तर रस्त्यावर अथवा रस्त्याच्या काठावरील घरात पाणी शिरणे ही नित्याची बाब आहे. भूमिगत गटार नालीचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. कित्येक वार्डात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात नळाद्वारे उपलब्ध होत नाही. अनेक नवीन वस्तींमध्ये रस्ता व नालीचे बांधकाम झाले नाही. जनतेने आपल्या तक्रारी ‘अ‍ॅप’वर टाकून प्रशासनाला कळवाव्या म्हणून हजारो रूपये खर्च करून अ‍ॅप तयार करणारी गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत म्हणून दिंडोरा पिटविल्या गेला. परंतु अ‍ॅपद्वारे एकाही तक्रारीचे निवारण झाले नाही. तसेच तक्रारीही पाहिल्या जात नाही. चामोर्शी येथे स्मशानभूमीची व्यवस्था नाही. स्मशानभूमी नसल्याने कित्येकांची कुचंबणा होत असते. बसस्थानकावरील प्रसाधनगृहाची दयनिय अवस्था आहे. वाढत्या अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. क्रीडासंकूल व बसडेपो, बसस्थानक व अनेक योजनांसाठी लागणाऱ्या शासकीय जागा उपलब्ध असतानाही अतिक्रमणाच्या विळख्यामुळे या योजना शहरात कार्यान्वित होऊ शकल्या नाही. शहरात सुसज्ज नाट्यगृह व सभागृह असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ओपन स्पेसची जागा आहे. त्या वसाहतीत बालोद्यान व उद्यानाची गरज आहे. नगर पंचायतीचे स्वत:चे सुसज्ज वाचनालय असणे शहराचे वैभव असते. परंतु आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. शहराच्या सर्व रस्त्यावर स्वच्छता दिसून येत नाही. केवळ घंटागाडी फिरविल्याने स्वच्छता राहणार नाही. एक हजार कोटीचा निधी आणला तरी शहरातील समस्या सुटतील, असे म्हणता येत नाही. फुले, शाहू, आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे उच्चविद्याविभुषीत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष शहराला लाभले आहे. ते विकासाच्या कसोटीत उतरण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष