शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पुलांमुळे सिरोंचा तालुक्याची मार्केटिंग तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:14 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विविध व्यवसाय, उद्योगधंदे व अन्य कौंटुंबिक कामाकरिता तेलंगणा राज्यात पूर्वी पुलाअभावी जात नव्हते. परंतु दोन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने तालुक्यातील मार्केटिंग तेलंगणात वाढली.

ठळक मुद्देसंडे अँकर । व्यवसायासह विविध कामांकरिता नागरिकांसाठी झाले सोयीचे

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विविध व्यवसाय, उद्योगधंदे व अन्य कौंटुंबिक कामाकरिता तेलंगणा राज्यात पूर्वी पुलाअभावी जात नव्हते. परंतु दोन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने तालुक्यातील मार्केटिंग तेलंगणात वाढली. केवळ कार्यालयीन कामाकरिता नागरिकांना गडचिरोली येथे जावे लागते.अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांचा संपर्क थेट तेलंगणा राज्याशी येत असल्याने ते नेहमी तेथे जात असतात. सिरोंचा तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या तीन नद्या आहेत. गोदावरी, प्राणहिता या नद्यांवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अन्य एक पूल अंतिम टप्प्यात असून तो या वर्षाच्या शेवट पूर्णत्त्वास येणार आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा मुख्यालय अडीचशे किमी लांब आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिक तेलंगणा राज्यातच रोटी-बेटीचे संबंध जोडतात. त्यामुळे पुलाच्या मार्गावरून नेहमीच वर्दळ दिसून येते. सिरोंचा तालुक्यातील नागरिक लग्न समारंभ यासह विविध कामांकरिता कापड खरेदी तसेच अन्य साहित्य खरेदी करण्याकरिता तेलंगणा राज्यातील वरंगल, करिमनगर तसेच हैद्राबाद येथे जातात. विशेष म्हणजे, वरंगल १०५, करिमनगर १२८ व हैद्राबाद २५० किमी अंतरावर आहे. या शहरांमध्ये आवश्यक वस्तू उपलब्ध असल्याने तालुक्यातील नागरिक गडचिरोली अथवा अहेरी येथे येण्यापेक्षा तेलंगणा राज्यातील या शहरांमध्ये जाणे योग्य समजतात. याशिवाय आरोग्यसोयीच्या दृष्टीने वरंगल येथे सुविधायुक्त शासकीय रूग्णालय असल्याने अहेरी उपविभागातील बहुतांश रूग्ण उपचारासाठी तेथे जातात.शिक्षणासाठीही पसंतीसिरोंचा तालुक्यातील गर्भश्रीमंत व्यक्तींची मुले उच्च शिक्षणाकरिता हैद्राबाद, वरंगल येथे जातात. या शहरांमध्ये जाऊन इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण घेतात. महाराष्टÑाच्या तुलनेत तेलंगणा राज्याचा विकास जलदगतीने होत आहे, असा समज तालुक्यातील बहुतांश लोकांचा आहे. त्यादृष्टीने ते गडचिरोली जिल्ह्यात विविध कामानिमित्त जाण्यापेक्षा तेलंगणा राज्य निवडतात. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश नागरिक विविध कामाकरिता तेलंगणा राज्यात जात असल्याने या राज्यातील लोकांशी तालुक्यातील नागरिकांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येते.खरेदी-विक्रीचेही व्यवहारसिरोंचा तालुक्यातील नागरिक तेलंगणा राज्यात व्यवसाय व अन्य कामाकरिता जात असले तरी तेलंगणा राज्यातील अनेक लोकांनी सिरोंचा तालुक्यात प्लॉट व शेतीची खरेदी केलेली आहे. दक्षिण गडचिरोली विभागातील लोकांनीही तेलंगणा राज्यात आपला मोर्चा वळविला आहे. तेलंगणा राज्याशी सिरोंचा तालुक्याची नाळ जुळत आहे. याचाच परिणाम अहेरी विधानसभा क्षेत्र तेलंगणा राज्यात समाविष्ट करण्याची मागणीही जोर धरत आहे.