शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

पुलांमुळे सिरोंचा तालुक्याची मार्केटिंग तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:14 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विविध व्यवसाय, उद्योगधंदे व अन्य कौंटुंबिक कामाकरिता तेलंगणा राज्यात पूर्वी पुलाअभावी जात नव्हते. परंतु दोन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने तालुक्यातील मार्केटिंग तेलंगणात वाढली.

ठळक मुद्देसंडे अँकर । व्यवसायासह विविध कामांकरिता नागरिकांसाठी झाले सोयीचे

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विविध व्यवसाय, उद्योगधंदे व अन्य कौंटुंबिक कामाकरिता तेलंगणा राज्यात पूर्वी पुलाअभावी जात नव्हते. परंतु दोन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने तालुक्यातील मार्केटिंग तेलंगणात वाढली. केवळ कार्यालयीन कामाकरिता नागरिकांना गडचिरोली येथे जावे लागते.अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांचा संपर्क थेट तेलंगणा राज्याशी येत असल्याने ते नेहमी तेथे जात असतात. सिरोंचा तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या तीन नद्या आहेत. गोदावरी, प्राणहिता या नद्यांवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अन्य एक पूल अंतिम टप्प्यात असून तो या वर्षाच्या शेवट पूर्णत्त्वास येणार आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा मुख्यालय अडीचशे किमी लांब आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिक तेलंगणा राज्यातच रोटी-बेटीचे संबंध जोडतात. त्यामुळे पुलाच्या मार्गावरून नेहमीच वर्दळ दिसून येते. सिरोंचा तालुक्यातील नागरिक लग्न समारंभ यासह विविध कामांकरिता कापड खरेदी तसेच अन्य साहित्य खरेदी करण्याकरिता तेलंगणा राज्यातील वरंगल, करिमनगर तसेच हैद्राबाद येथे जातात. विशेष म्हणजे, वरंगल १०५, करिमनगर १२८ व हैद्राबाद २५० किमी अंतरावर आहे. या शहरांमध्ये आवश्यक वस्तू उपलब्ध असल्याने तालुक्यातील नागरिक गडचिरोली अथवा अहेरी येथे येण्यापेक्षा तेलंगणा राज्यातील या शहरांमध्ये जाणे योग्य समजतात. याशिवाय आरोग्यसोयीच्या दृष्टीने वरंगल येथे सुविधायुक्त शासकीय रूग्णालय असल्याने अहेरी उपविभागातील बहुतांश रूग्ण उपचारासाठी तेथे जातात.शिक्षणासाठीही पसंतीसिरोंचा तालुक्यातील गर्भश्रीमंत व्यक्तींची मुले उच्च शिक्षणाकरिता हैद्राबाद, वरंगल येथे जातात. या शहरांमध्ये जाऊन इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण घेतात. महाराष्टÑाच्या तुलनेत तेलंगणा राज्याचा विकास जलदगतीने होत आहे, असा समज तालुक्यातील बहुतांश लोकांचा आहे. त्यादृष्टीने ते गडचिरोली जिल्ह्यात विविध कामानिमित्त जाण्यापेक्षा तेलंगणा राज्य निवडतात. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश नागरिक विविध कामाकरिता तेलंगणा राज्यात जात असल्याने या राज्यातील लोकांशी तालुक्यातील नागरिकांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येते.खरेदी-विक्रीचेही व्यवहारसिरोंचा तालुक्यातील नागरिक तेलंगणा राज्यात व्यवसाय व अन्य कामाकरिता जात असले तरी तेलंगणा राज्यातील अनेक लोकांनी सिरोंचा तालुक्यात प्लॉट व शेतीची खरेदी केलेली आहे. दक्षिण गडचिरोली विभागातील लोकांनीही तेलंगणा राज्यात आपला मोर्चा वळविला आहे. तेलंगणा राज्याशी सिरोंचा तालुक्याची नाळ जुळत आहे. याचाच परिणाम अहेरी विधानसभा क्षेत्र तेलंगणा राज्यात समाविष्ट करण्याची मागणीही जोर धरत आहे.