शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

मानापूर-रांगी परिसर पावसाअभावी कोरडाच

By admin | Updated: August 3, 2014 23:24 IST

यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातील पावसाने दगा दिला. त्यानंतर उशीरापर्यंत पावसाळ्याला सुरूवात झाली. ८ ते १० दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मानापूर-रांगी

मानापूर/देलनवाडी : यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातील पावसाने दगा दिला. त्यानंतर उशीरापर्यंत पावसाळ्याला सुरूवात झाली. ८ ते १० दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मानापूर-रांगी परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. या भागातील जलस्त्रोतही अर्धवट स्थितीतच आहेत.मानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना दुबार धान पेरणी करावी लागली. त्यानंतर अल्प पाऊस झाल्याने थोड्याफार शेतकऱ्यांनी रोवणी हंगामाला सुरूवात केली. परंतु पाऊस फार काळ टिकला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना रोवणी हंगामाला सुरूवात केली होती. अशा शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. अनेक शेतकऱ्यांची रोवणी वाळवी लागण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मानापूर परिसरातील भाकरोंडी, रांगी, बेलगाव, मोहली, निमगाव, निमनवाडा, पिसेवडधा परिसरातील तळी, बोडी व इतर जलस्त्रोत अजूनही पूर्णत: भरले नाही. मागील १५ दिवसापूर्वी आलेल्या पावसाने खरीप हंगामाला सुरूवात करून दिली होती. परंतु अल्पावधीतच पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी आपली रोवणी पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे, असे शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाला आठ दिवस उशीर झाल्यास धान पिकाच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.