शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

महाराष्टÑ दर्शनाने भारावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:45 IST

जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली.

ठळक मुद्देप्रथमच ठेवले जिल्ह्याबाहेर पाऊल : पोलीस व आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली. आदिवासी बहूल भागातील विद्यार्थी महाराष्टÑातील वेगवेगळ्या स्थळांचे दर्शन घेऊन भारावून गेले असल्याचे दिसून आले.अतिदुर्गम भागातील नक्षल पीडित तसेच नक्षल पाल्यांच्या यामध्ये समावेश होता. ८६ विद्यार्थी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाºयांचे पथक यांच्यासह ९८ जणांचा या सहलीमध्ये समावेश करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना रेल्वे, मेट्रो, समुद्र, गेटवे आॅॅफ इंडिया, सायन्स म्युझियम, गड, किल्ले, गार्डन, एसेल वर्ड ही ठिकाणे दाखविण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याची सीमा रेषा ओलांडली नव्हती. त्यामुळे आपल्या प्रमाणेच संपूर्ण राज्यात जंगल असावे, अशाच प्रकारची गरीबी असावी असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र महाराष्टÑ दर्शन सहलीतून हा भ्रम दूर होण्यास मदत झाली. महाराष्टÑाने विविध बाबतीत किती प्रगती केली आहे, हे स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली आहे.१९ सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांची १६ वी फेरी गडचिरोली येथे पोहोचली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. या समारोपीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यानचे अनुभव सांगितले. मनोगतादरम्यान भविष्यात आपण पोलीस, डॉक्टर, शिक्षक, वनरक्षक, उद्योजक बणून गडचिरोली जिल्ह्याची नक्षलवादी ही ओळख पुसून आर्थिक, सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या विकसीत जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशासनाचे राजदूत बणून लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. संचालन पीएसआय तेजस्वी पाटील यांनी केले.