शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

महाराष्टÑ दर्शनाने भारावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:45 IST

जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली.

ठळक मुद्देप्रथमच ठेवले जिल्ह्याबाहेर पाऊल : पोलीस व आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली. आदिवासी बहूल भागातील विद्यार्थी महाराष्टÑातील वेगवेगळ्या स्थळांचे दर्शन घेऊन भारावून गेले असल्याचे दिसून आले.अतिदुर्गम भागातील नक्षल पीडित तसेच नक्षल पाल्यांच्या यामध्ये समावेश होता. ८६ विद्यार्थी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाºयांचे पथक यांच्यासह ९८ जणांचा या सहलीमध्ये समावेश करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना रेल्वे, मेट्रो, समुद्र, गेटवे आॅॅफ इंडिया, सायन्स म्युझियम, गड, किल्ले, गार्डन, एसेल वर्ड ही ठिकाणे दाखविण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याची सीमा रेषा ओलांडली नव्हती. त्यामुळे आपल्या प्रमाणेच संपूर्ण राज्यात जंगल असावे, अशाच प्रकारची गरीबी असावी असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र महाराष्टÑ दर्शन सहलीतून हा भ्रम दूर होण्यास मदत झाली. महाराष्टÑाने विविध बाबतीत किती प्रगती केली आहे, हे स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली आहे.१९ सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांची १६ वी फेरी गडचिरोली येथे पोहोचली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. या समारोपीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यानचे अनुभव सांगितले. मनोगतादरम्यान भविष्यात आपण पोलीस, डॉक्टर, शिक्षक, वनरक्षक, उद्योजक बणून गडचिरोली जिल्ह्याची नक्षलवादी ही ओळख पुसून आर्थिक, सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या विकसीत जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशासनाचे राजदूत बणून लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. संचालन पीएसआय तेजस्वी पाटील यांनी केले.