शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ दर्शनाने भारावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:45 IST

जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली.

ठळक मुद्देप्रथमच ठेवले जिल्ह्याबाहेर पाऊल : पोलीस व आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली. आदिवासी बहूल भागातील विद्यार्थी महाराष्टÑातील वेगवेगळ्या स्थळांचे दर्शन घेऊन भारावून गेले असल्याचे दिसून आले.अतिदुर्गम भागातील नक्षल पीडित तसेच नक्षल पाल्यांच्या यामध्ये समावेश होता. ८६ विद्यार्थी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाºयांचे पथक यांच्यासह ९८ जणांचा या सहलीमध्ये समावेश करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना रेल्वे, मेट्रो, समुद्र, गेटवे आॅॅफ इंडिया, सायन्स म्युझियम, गड, किल्ले, गार्डन, एसेल वर्ड ही ठिकाणे दाखविण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याची सीमा रेषा ओलांडली नव्हती. त्यामुळे आपल्या प्रमाणेच संपूर्ण राज्यात जंगल असावे, अशाच प्रकारची गरीबी असावी असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र महाराष्टÑ दर्शन सहलीतून हा भ्रम दूर होण्यास मदत झाली. महाराष्टÑाने विविध बाबतीत किती प्रगती केली आहे, हे स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली आहे.१९ सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांची १६ वी फेरी गडचिरोली येथे पोहोचली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. या समारोपीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यानचे अनुभव सांगितले. मनोगतादरम्यान भविष्यात आपण पोलीस, डॉक्टर, शिक्षक, वनरक्षक, उद्योजक बणून गडचिरोली जिल्ह्याची नक्षलवादी ही ओळख पुसून आर्थिक, सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या विकसीत जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशासनाचे राजदूत बणून लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. संचालन पीएसआय तेजस्वी पाटील यांनी केले.