शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

Maharashtra Election 2019 : १९९५ मध्ये ठरली होती सर्वाधिक अवैध मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे.

ठळक मुद्देईव्हीएमनंतर घटले प्रमाण : विधानसभेसाठी पहिल्यांदाच होणार व्हीव्हीपॅटचा वापर

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २००० पूर्वीपर्यंत मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. त्यावेळी काही नागरिक दोनपेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. असे मतदान अवैध ठरत होते. १९९५ च्या निवडणुकीत सुमारे ७ हजार १७५ तर १९९९ च्या निवडणुकीत ७ हजार १२८ मतदान अवैध ठरले होते.१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे. मात्र काही मतदार एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरत होते. काही मतदार शिक्का न मारताच मतपत्रिका पेटीत टाकत होते तर काहींचा शिक्का व्यवस्थित उमटत नव्हता. काही वेळेला दोन निवडणूक चिन्हांच्या मध्ये शिक्का बसल्याने नेमके कुणाला मतदान झाले, हे स्पष्ट होत नव्हते. परिणामी सदर मतदान अवैध ठरविले जात होते. मतपत्रिकांचा वापर जोपर्यंत सुरू होता, तोपर्यंत अवैध मतांची संख्या अधिक होती. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना मतदान कसे करावे, याबाबतही पुरेशी माहिती राहत नव्हती. परिणामी मते अवैध ठरण्याचे प्रमाण अधिक राहत होते.२००४ नंतर ईव्हीएमचा वापर सुरू झाला. ईव्हीएममध्ये एकदाच मतदान करण्याची मुभा आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये अवैध मते ठरत नाही. आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच होणार आहे. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. पोस्टल मतदान सुद्धा मतपत्रिकेप्रमाणेच राहते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरण्याची शक्यता राहते. २००४ च्या निवडणुकीत १९ मतदान अवैध ठरले होते. २००९ मध्ये ४७ तर २०१४ च्या निवडणुकीत ३०१ मतदान अवैध ठरले होते.ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या सुटलीईव्हीएममध्ये मतदाराला एकदाच बटन दाबण्याची मुभा मिळते. त्यानंतर मशीन आपोआप लॉक होते. त्यामुळे तोे दुसऱ्यांदा बटन दाबू शकत नाही. दुसऱ्यांदा बटन दाबले तरी मशीन प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अवैध मते ठरत नाही. या मशीनचा कंट्रोलिंग मतदान केंद्राधिकाºयाकडे राहते. दुसरा मतदार आल्यानंतर मतदान केंद्राधिकारी त्याच्याकडे असलेली बटन दाबते. त्यानंतर दुसºया मतदाराला मतदान करता येते. ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या दूर झाली आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली