शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election 2019 : १९९५ मध्ये ठरली होती सर्वाधिक अवैध मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे.

ठळक मुद्देईव्हीएमनंतर घटले प्रमाण : विधानसभेसाठी पहिल्यांदाच होणार व्हीव्हीपॅटचा वापर

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २००० पूर्वीपर्यंत मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. त्यावेळी काही नागरिक दोनपेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. असे मतदान अवैध ठरत होते. १९९५ च्या निवडणुकीत सुमारे ७ हजार १७५ तर १९९९ च्या निवडणुकीत ७ हजार १२८ मतदान अवैध ठरले होते.१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे. मात्र काही मतदार एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरत होते. काही मतदार शिक्का न मारताच मतपत्रिका पेटीत टाकत होते तर काहींचा शिक्का व्यवस्थित उमटत नव्हता. काही वेळेला दोन निवडणूक चिन्हांच्या मध्ये शिक्का बसल्याने नेमके कुणाला मतदान झाले, हे स्पष्ट होत नव्हते. परिणामी सदर मतदान अवैध ठरविले जात होते. मतपत्रिकांचा वापर जोपर्यंत सुरू होता, तोपर्यंत अवैध मतांची संख्या अधिक होती. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना मतदान कसे करावे, याबाबतही पुरेशी माहिती राहत नव्हती. परिणामी मते अवैध ठरण्याचे प्रमाण अधिक राहत होते.२००४ नंतर ईव्हीएमचा वापर सुरू झाला. ईव्हीएममध्ये एकदाच मतदान करण्याची मुभा आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये अवैध मते ठरत नाही. आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच होणार आहे. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. पोस्टल मतदान सुद्धा मतपत्रिकेप्रमाणेच राहते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरण्याची शक्यता राहते. २००४ च्या निवडणुकीत १९ मतदान अवैध ठरले होते. २००९ मध्ये ४७ तर २०१४ च्या निवडणुकीत ३०१ मतदान अवैध ठरले होते.ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या सुटलीईव्हीएममध्ये मतदाराला एकदाच बटन दाबण्याची मुभा मिळते. त्यानंतर मशीन आपोआप लॉक होते. त्यामुळे तोे दुसऱ्यांदा बटन दाबू शकत नाही. दुसऱ्यांदा बटन दाबले तरी मशीन प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अवैध मते ठरत नाही. या मशीनचा कंट्रोलिंग मतदान केंद्राधिकाºयाकडे राहते. दुसरा मतदार आल्यानंतर मतदान केंद्राधिकारी त्याच्याकडे असलेली बटन दाबते. त्यानंतर दुसºया मतदाराला मतदान करता येते. ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या दूर झाली आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली