शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

Maharashtra Election 2019 ; अनेक वेळा मतदारांचा कौल विरोधी पक्षाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

गडचिरोली मतदार संघात सन १९६२ पासून ते आतापर्यंत निवडून आलेले बहुतांश आमदार विरोधी पक्षातच बसलेले आहेत. सन १९८०, १९९०, २००९ तसेच २०१४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे होते. या चार निवडणुकांचा अपवाद वगळता बहुतांशवेळा गडचिरोलीचे आमदार विरोधी पक्षाचे होते.

ठळक मुद्देआरमोरी सत्तापक्षाकडे : तर गडचिरोली व अहेरीतील बहुतांश आमदारांच्या नशिबी विरोधी पक्ष

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : अहेरी, गडचिरोली, आरमोरी या तिनही विधानसभा मतदार संघामध्ये सन १९६२ च्या पहिल्या निवडणुकीपासून तर २०१४ पर्यंत झालेल्या एकूण १२ निवडणुकीचे निरीक्षण केल्यास आरमोरी मतदार संघातील सर्वाधिक आमदार सत्ता पक्षात तर अहेरी व गडचिरोली या दोन मतदार संघातील आमदार अधिकाधिक वेळा विरोधी पक्षात बसल्याचे दिसून येते.अहेरी मतदार संघात अधिकाधिक आमदार हे विरोधी पक्षात बसले. मात्र सन १९७२, १९८०, १९९० व २०१४ या चार निवडणुकीमध्ये विजयी झालेले आमदार हे सत्तापक्षात बसले होते. या मतदार संघातील मतदारांचा कौल हा सत्तेबाहेरच्या आमदाराला निवडून देण्याचा दिसतो.गडचिरोली मतदार संघात सन १९६२ पासून ते आतापर्यंत निवडून आलेले बहुतांश आमदार विरोधी पक्षातच बसलेले आहेत. सन १९८०, १९९०, २००९ तसेच २०१४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे होते. या चार निवडणुकांचा अपवाद वगळता बहुतांशवेळा गडचिरोलीचे आमदार विरोधी पक्षाचे होते.आरमोरी मतदार संघात १९६२ ला काँग्रेसचे जगन्नाथ टेमसाजी म्हशाखेत्री, १९६७ ला दिनाजी नारनवरे, १९७२ मध्ये बाबुराव नारायण मडावी, २००४ व २००९ ला आनंदराव गेडाम, १९८० ला बाबुराव नारायण मडावी व १९८५ मध्ये पुंडलिक उईके आमदार म्हणून निवडून आले व हे सर्व आमदार सत्तापक्षात बसले. १९९५ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे झाले होते. त्यावेळी आरमोरी मतदार संघातून १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ.रामकृष्ण मडावी आमदार झाले होते तर २०१४ मध्ये सर्वाधिक जागा मिळवून भाजपचे मुख्यमंत्री झाले. या मतदार संघातून कृष्णा गजबे आमदार झाले.सन १९८० ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी याच पक्षाचे उमेदवार तिनही मतदार संघात आमदार म्हणून निवडून आले. २०१४ ला भाजप-सेना युतीचे सरकार महाराष्ट्रात बसले. यावेळी जिल्ह्यातील तीनही आमदार सत्ताधारी पक्षाचे निवडून आले.एकूणच आरमोरी मतदार संघ हा सत्ताधारी पक्षाला कौल देणारा तर गडचिरोली व अहेरी मतदार संघ बहुतांश वेळा विरोधी पक्षाला कौल देणारा ठरला.१९७८ ला लोकशाही दलाची सत्तासन १९७८ च्या निवडणुकीत पुरोगामी लोकशाही दलाचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले. त्यावेळी आरमोरी मतदार संघातून अपक्ष उमेदवार दिनाजी विठोबा नारनवरे विजयी होऊन आमदार झाले. १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. त्यावेळी या क्षेत्रातून सेनेचे हरिराम वरखडे आमदार झाले. १९९९ ला काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी शिवसेनेचे रामकृष्ण मडावी आमदार झाले. १९७८, १९९० व १९९९ या तीन निवडणुकींचा अपवाद वगळता आरमोरी मतदार संघाने सत्ताधारी पक्षालाच अधिक कौल दिल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यातील तीनही मतदार संघ अनुसूचित जमातीकरिता राखीव आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून या समाजातील काही मोजक्याच पुढाऱ्यांना संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली