शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

महागाव खुर्द आठ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:31 IST

पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महावितरणच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर दुरूस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष; साप, विंचू चावण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : अहेरी तालुकास्थळापासून जवळच असलेल्या महागाव खुर्द येथील वीज ट्रान्सफार्मर जळाल्याने या गावाचा वीज पुरवठा मागील आठ दिवसांपासून खंडीत झाला आहे. नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत आहे.आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळवाऱ्यामुळे महागाव खुर्द येथील ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्कीट होऊन सदर ट्रान्सफार्मर जळाला. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा खंडीत झाला. ट्रान्सफार्मर जळाल्याची माहिती गावातील नागरिकांनी महावितरणला दिली आहे. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटूनही ट्रान्सफार्मर दुरूस्ती करण्याविषयी महावितरणने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा खंडीतच आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महावितरणच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. ट्रान्सफार्मरची लवकर दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलनचा इशारा महागाव येथील सरपंच श्रीहरी आलाम, ग्रा.पं. सदस्य गणेश चौधरी, श्रीनिवास आलाम, तुकाराम नैताम यांनी दिला आहे.खंडीत वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्तमहागाव खुर्द परिसरातील जवळपास सर्वच गावांमध्ये वीज पोहोचली आहे. प्रत्येक घरामध्ये वीज जोडणी आहे. मात्र सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर चार ते पाच दिवस तो पूर्ववत होत नाही. बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी सुध्दा राहत नाही.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण