शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

महाबीज उपाशी, खासगी कंपन्या तुपाशी

By admin | Updated: July 6, 2017 01:36 IST

खरीप हंगामासाठी पऱ्हे टाकणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पाऊस लांबल्यामुळे पऱ्हे टाकण्यास उशिर झाला असला तरी धानाचे पीक

शासनाचे अजब धोरण : सरकारी कंपनीने गमावला शेतकऱ्यांचा विश्वास? लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खरीप हंगामासाठी पऱ्हे टाकणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पाऊस लांबल्यामुळे पऱ्हे टाकण्यास उशिर झाला असला तरी धानाचे पीक वेळेत येण्यासाठी येत्या १५ दिवसात पऱ्हे टाकणे आवश्यक झाले आहे. दुसरीकडे बियाण्यांच्या मागणीबाबत केलेल्या नियोजनाला डावलून सरकारी कंपनी असलेल्या महाबीजला बाजुला सारत खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ५३ हजार हेक्टरवर भातपीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले असले तरी प्रत्यक्षात भाताची लागवड १ लाख ८५ हजार हेक्टरपर्यंत जाते. त्यादृष्टीने यावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी बियाण्यांच्या मागणीचे नियोजन केले होते. त्यात महाबीजचे १५ हजार क्विंटल तर खासगी कंपन्यांचे ११ हजार ७४० क्विंटल असे एकूण २६ हजार ७४० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत २३ हजार ७७८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. त्यात महाबीजचे बियाणे अवघे ६४६६ क्विंटल आहे तर खासगी कंपन्यांचे बियाणे तब्बल १७ हजार ३१२ क्विंटल आहे. मागणीच्या तुलनेत महाबीजच्या धान बियाण्यांचा पुरवठा ८५३४ क्विंटलने कमी तर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत ५५७२ क्विंटल जास्त झाला आहे. शासकीय बियाणे कंपनीला सोडून खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना प्राधान्य देण्याचे हे धोरण नेमके कशासाठी? हा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत कृषी केंद्र संचालकांवरही भुरळ घातली असल्याचे यावरून दिसून येत आहे. आतापर्यंत ५२११ हेक्टरवर पऱ्हे टाकणी झाली आहे. अजून २० ते २५ टक्के शेतकरी पऱ्हे टाकण्यासाठी पावसाची वाट पाहात आहेत. कर्जमाफीच्या खेळात शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळेही पऱ्हे टाकण्यासाठी विलंब लागत आहे. खासगी कंपन्यांचे साटेलोटे दोन वर्षांपूर्वी महाबीजचे बियाणे बोगस निघाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा या सरकारी कंपनीवरील विश्वास उडाला आहे, असे खुद्द कृषी विभागाचे अधिकारीच सांगत आहेत. ही बाब खासगी कंपन्यांच्या पथ्यावर पडत आहे. वास्तविक पाहता दरवर्षी बियाण्यांच्या नवनवीन कंपन्यांची बाजारात भर पडते. त्यांना सरकारी परवानगीही रितसर दिली जाते. या कंपन्या दुकानदारांना मोठा नफा देत महागडे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. पण सरकारी कंपनी महाबीजच्या बियाण्यांचा दर्जा कायम ठेवून ते कमी दरात शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यावर मात्र भर दिला जात नाही. त्यामुळे खासगी कंपन्या, दुकानदार, अधिकारी आणि सरकारी यंत्रणा यांचे साटेलोटे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. कोणत्याच कृषी केंद्रावर कारवाई नाही जिल्ह्यात बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीची जवळपास एक हजार दुकाने आहेत. या दुकानदारांनी नियमाप्रमाणे प्रत्येक मालाचे दरपत्रक दुकानात लावणे आवश्यक आहे. याशिवाय दैनंदिन स्टॉक रजिस्टर ठेवणे व इतरही अनेक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली जाते. पण बहुतांश कृषी केंद्र संचालकांकडून सर्व नियमांचे पालन होत नसताना कोणावरही आतापर्यंत तात्पुरता किंवा स्थायी स्वरूपात परवाना रद्द करण्याची कारवाई किंवा स्टॉक सील करण्याची कारवाई झालेली नाही. बियाण्यांचे २३२ नमुने तपासणीसाठी पाठविल्याचे कृषी विकास अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले. पण त्या नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत खरीप हंगाम संपत आलेला असतो.