शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

मौशीखांब परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:27 IST

ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना शासकीय योजनेतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून ...

ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना शासकीय योजनेतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून रस्ते, नाल्या, समाजभवन व इतर कामे हाती घेण्यात आली. मात्र दमदार पाऊस झाल्याने शेती मशागतीची लगबग वाढली आहे. परिणामी कंत्राटदाराला मजूर मिळत नसल्याने ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली आहेत.

दिना धरणाचे खोलीकरण करण्याची मागणी

चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.

ग्रामीण रस्त्यांसाठी वाढीव निधी द्या

गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण रस्ते दुरूस्तीकरीता ३०-५४ शिर्षाअंतर्गत वाढीव ५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते उपलब्ध होण्यास मदत होईल.

नेट मार्केटींग संस्थांचा धुमाकूळ

गडचिरोली : पैशावर मोठे व्याजदर देण्याची आमिष दाखविणाºया अनेक संस्था सध्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. ग्राहक यांना बळी पडत आहे. अशा संस्थांमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

आश्रमशाळांची

अवस्था चिंताजनक

गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांची अवस्था चिंताजनक आहे़ कित्येक आश्रमशाळांमध्ये अधिकृत मुख्याध्यापक नाही़ महिला अधिक्षिकांची पदेही रिक्त आहेत़ विद्यार्थ्यांना आवश्यक सूविधा पुरविण्यात येत नाही़

अनेक रूग्णवाहिका नादुरूस्त

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक रूग्णालयाला रूग्णवाहिका देण्यात आली आहे. मात्र यातील बहुतांश रूग्णवाहीका नादुरूस्त असून त्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या रूग्णवाहिकांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भामरागड तालुक्यातील सौरदिव्यांमध्ये बिघाड

भामरागड : अतिदुर्गम भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सौरदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

विटाभट्टीच्या मलब्याने धोका

देसाईगंज : कोरेगाव परिसरातील गाढवी नदीच्या काठावर असलेल्या विटाभट्टी मालकांनी विटाभट्टी लावलेल्या ठिकाणचा मलबा गाढवी नदी पात्रात टाकल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या भागातील बहुतांश परिसरात गाढवी नदीचे पात्र अतिशय संकुचित झाले आहेत. तसेच गावातील मृत जनावरांना देखील या मलब्यावर फेकत असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.