शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

मौशीखांब परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:27 IST

ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना शासकीय योजनेतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून ...

ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना शासकीय योजनेतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून रस्ते, नाल्या, समाजभवन व इतर कामे हाती घेण्यात आली. मात्र दमदार पाऊस झाल्याने शेती मशागतीची लगबग वाढली आहे. परिणामी कंत्राटदाराला मजूर मिळत नसल्याने ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली आहेत.

दिना धरणाचे खोलीकरण करण्याची मागणी

चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.

ग्रामीण रस्त्यांसाठी वाढीव निधी द्या

गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण रस्ते दुरूस्तीकरीता ३०-५४ शिर्षाअंतर्गत वाढीव ५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते उपलब्ध होण्यास मदत होईल.

नेट मार्केटींग संस्थांचा धुमाकूळ

गडचिरोली : पैशावर मोठे व्याजदर देण्याची आमिष दाखविणाºया अनेक संस्था सध्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. ग्राहक यांना बळी पडत आहे. अशा संस्थांमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

आश्रमशाळांची

अवस्था चिंताजनक

गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांची अवस्था चिंताजनक आहे़ कित्येक आश्रमशाळांमध्ये अधिकृत मुख्याध्यापक नाही़ महिला अधिक्षिकांची पदेही रिक्त आहेत़ विद्यार्थ्यांना आवश्यक सूविधा पुरविण्यात येत नाही़

अनेक रूग्णवाहिका नादुरूस्त

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक रूग्णालयाला रूग्णवाहिका देण्यात आली आहे. मात्र यातील बहुतांश रूग्णवाहीका नादुरूस्त असून त्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या रूग्णवाहिकांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भामरागड तालुक्यातील सौरदिव्यांमध्ये बिघाड

भामरागड : अतिदुर्गम भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सौरदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

विटाभट्टीच्या मलब्याने धोका

देसाईगंज : कोरेगाव परिसरातील गाढवी नदीच्या काठावर असलेल्या विटाभट्टी मालकांनी विटाभट्टी लावलेल्या ठिकाणचा मलबा गाढवी नदी पात्रात टाकल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या भागातील बहुतांश परिसरात गाढवी नदीचे पात्र अतिशय संकुचित झाले आहेत. तसेच गावातील मृत जनावरांना देखील या मलब्यावर फेकत असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.