शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मौशीखांब परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:27 IST

ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना शासकीय योजनेतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून ...

ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना शासकीय योजनेतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून रस्ते, नाल्या, समाजभवन व इतर कामे हाती घेण्यात आली. मात्र दमदार पाऊस झाल्याने शेती मशागतीची लगबग वाढली आहे. परिणामी कंत्राटदाराला मजूर मिळत नसल्याने ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली आहेत.

दिना धरणाचे खोलीकरण करण्याची मागणी

चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.

ग्रामीण रस्त्यांसाठी वाढीव निधी द्या

गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण रस्ते दुरूस्तीकरीता ३०-५४ शिर्षाअंतर्गत वाढीव ५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते उपलब्ध होण्यास मदत होईल.

नेट मार्केटींग संस्थांचा धुमाकूळ

गडचिरोली : पैशावर मोठे व्याजदर देण्याची आमिष दाखविणाºया अनेक संस्था सध्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. ग्राहक यांना बळी पडत आहे. अशा संस्थांमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

आश्रमशाळांची

अवस्था चिंताजनक

गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांची अवस्था चिंताजनक आहे़ कित्येक आश्रमशाळांमध्ये अधिकृत मुख्याध्यापक नाही़ महिला अधिक्षिकांची पदेही रिक्त आहेत़ विद्यार्थ्यांना आवश्यक सूविधा पुरविण्यात येत नाही़

अनेक रूग्णवाहिका नादुरूस्त

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक रूग्णालयाला रूग्णवाहिका देण्यात आली आहे. मात्र यातील बहुतांश रूग्णवाहीका नादुरूस्त असून त्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या रूग्णवाहिकांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भामरागड तालुक्यातील सौरदिव्यांमध्ये बिघाड

भामरागड : अतिदुर्गम भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सौरदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

विटाभट्टीच्या मलब्याने धोका

देसाईगंज : कोरेगाव परिसरातील गाढवी नदीच्या काठावर असलेल्या विटाभट्टी मालकांनी विटाभट्टी लावलेल्या ठिकाणचा मलबा गाढवी नदी पात्रात टाकल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या भागातील बहुतांश परिसरात गाढवी नदीचे पात्र अतिशय संकुचित झाले आहेत. तसेच गावातील मृत जनावरांना देखील या मलब्यावर फेकत असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.