शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

साडेसहा लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 26, 2014 23:05 IST

गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची

साडेतीन वर्षात : वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकरी हवालदिलगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची नासधूस करतात. यासाठी वनविभागाने अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना केली नाही. सन २०१०-११ ते २०१४ च्या सप्टेंबर अखेरपर्यंत साडेतीन वर्षाच्या कालावधीत वन्यप्राणांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे ६ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात पाचही वनविभागात ७८ टक्के जंगल आहे. जंगलाला लागून शेकडो हेक्टर शेती आहे. या शेतामध्ये जिल्ह्यातील शेतकरी धान, सोयाबीन, कापूस, तूर, मुंग, उडीद, चना, गहू, ज्वारी आदीसह विविध प्रकारचे खरीप व रब्बी पिकांची लागवड करतात. याशिवाय कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांद्वारे सिंचनाच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अलिकडे जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला पिकांची लागवड करतात. अनेक शेतांना मजबूत स्वरूपाचे ताराचे कुंपन नाही. संरक्षणाअभावी जंगलातील रानडुकर, सांबर, हरिण आदीसह इतर वन्य प्राणी शेतात धुडगुस घालून शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान करतात. यंदा २०१४ मध्ये खरीप हंगामात अमिर्झा परिसरातील आंबेशिवणी, गिलगाव व इतर गावातील सोयाबिन पिकाची रानडुकराने मोठ्या प्रमाणात नुकसान केली होती. यासंदर्भात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमिर्झा परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्व्हेक्षण केले होते. या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सन २०१०-११ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात पीकहानीचे १९ प्रकरणे झाली. यावर्षात ६० हजार ४२० रूपयाचे वन्य प्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. २०११-१२ या वर्षात पीकहानीचे २९ प्रकरणाची नोंद वनविभागाने घेतली असून यावर्षात १ लाख ३३ हजार २५० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१२-१३ या वर्षात पीकाहानीचे ८४ प्रकरणे घडली. या वर्षात शेतकऱ्यांचे ३ लाख ५१ हजार २३० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पीकहानीचे ९ प्रकरणे घडली असून ६१ हजार १०० रूपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वनविभागामार्फत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाते. वनविभागाच्यावतीने सन २०१०-११ ते २०१२-१३ या वर्षातील पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७५ टक्क्याहून अधिक लोक शेती व्यवसाय करतात. जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. निसर्गाचा लहरीपणा, पूर परिस्थिती, अतिवृष्टी तसेच कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच तोट्याची शेती अनुभवावी लागत आहे. अलिकडे जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्यप्राण्यांच्या धुडगुसाचे प्रमाण वाढले आहे.वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर बाब गंभीर असल्याने शासनाने कृषी विभागामार्फत आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर ताराच्या कुंपनाचे वितरण करण्याची योजना हाती घ्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)