शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 26, 2014 23:05 IST

गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची

साडेतीन वर्षात : वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकरी हवालदिलगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची नासधूस करतात. यासाठी वनविभागाने अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना केली नाही. सन २०१०-११ ते २०१४ च्या सप्टेंबर अखेरपर्यंत साडेतीन वर्षाच्या कालावधीत वन्यप्राणांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे ६ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात पाचही वनविभागात ७८ टक्के जंगल आहे. जंगलाला लागून शेकडो हेक्टर शेती आहे. या शेतामध्ये जिल्ह्यातील शेतकरी धान, सोयाबीन, कापूस, तूर, मुंग, उडीद, चना, गहू, ज्वारी आदीसह विविध प्रकारचे खरीप व रब्बी पिकांची लागवड करतात. याशिवाय कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांद्वारे सिंचनाच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अलिकडे जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला पिकांची लागवड करतात. अनेक शेतांना मजबूत स्वरूपाचे ताराचे कुंपन नाही. संरक्षणाअभावी जंगलातील रानडुकर, सांबर, हरिण आदीसह इतर वन्य प्राणी शेतात धुडगुस घालून शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान करतात. यंदा २०१४ मध्ये खरीप हंगामात अमिर्झा परिसरातील आंबेशिवणी, गिलगाव व इतर गावातील सोयाबिन पिकाची रानडुकराने मोठ्या प्रमाणात नुकसान केली होती. यासंदर्भात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमिर्झा परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्व्हेक्षण केले होते. या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सन २०१०-११ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात पीकहानीचे १९ प्रकरणे झाली. यावर्षात ६० हजार ४२० रूपयाचे वन्य प्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. २०११-१२ या वर्षात पीकहानीचे २९ प्रकरणाची नोंद वनविभागाने घेतली असून यावर्षात १ लाख ३३ हजार २५० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१२-१३ या वर्षात पीकाहानीचे ८४ प्रकरणे घडली. या वर्षात शेतकऱ्यांचे ३ लाख ५१ हजार २३० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पीकहानीचे ९ प्रकरणे घडली असून ६१ हजार १०० रूपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वनविभागामार्फत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाते. वनविभागाच्यावतीने सन २०१०-११ ते २०१२-१३ या वर्षातील पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७५ टक्क्याहून अधिक लोक शेती व्यवसाय करतात. जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. निसर्गाचा लहरीपणा, पूर परिस्थिती, अतिवृष्टी तसेच कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच तोट्याची शेती अनुभवावी लागत आहे. अलिकडे जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्यप्राण्यांच्या धुडगुसाचे प्रमाण वाढले आहे.वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर बाब गंभीर असल्याने शासनाने कृषी विभागामार्फत आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर ताराच्या कुंपनाचे वितरण करण्याची योजना हाती घ्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)