शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

Lok Sabha Election 2019; घटक पक्षांना सोबत घेण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:12 IST

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देप्रचारात महत्त्वाचे स्थान : आघाडी आणि युतीमधील पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे. त्यासाठी त्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असून हे करताना उमेदवारांना थोडी कसरतही करावी लागत आहे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण पाहता गडचिरोली-चिमूर मतदार संघात काँग्रेस आणि भाजप अशीच सरळ झाल्याचे दिसून येते. यावेळची निवडणूकही त्यासाठी अपवाद नाही. उलट यावेळी इतर पक्षीय उमेदवारांचे अस्तित्व नगण्य राहून आघाडी-युती अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आघाडी व युतीमधील घटक पक्षांचे महत्व अधिक वाढले आहे.काँग्रेस महाआघाडीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये राष्टÑवादी काँग्रेस, शेकाप, पीरिपा (कवाडे), रिपाइं (गवई) या पक्षांचे अस्तित्व जिल्ह्यात आहे. तर भाजपच्या युतीमध्ये शिवसेना आणि रिपाइं (आठवले) हे प्रमुख पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांची दोन्ही पक्षांकडून खास सरबराई केली जात आहे. बॅनर, पोस्टरवर त्यांचे फोटोही झळकत आहेत. एवढेच नाही तर स्टेजवर किंवा बैठकांमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जात आहे.कोणत्याही कारणामुळे घटक पक्षांचे पदाधिकारी दुखावले जाणार नाही, किंवा आम्हाला डावलले, महत्व दिले नाही अशी भावना त्यांच्यात येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या पदाधिकाºयांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेना सोडली असली तरी त्यांचे कुरखेडा भागातील अस्तित्व पाहून भाजपने त्यांनाही जवळ केले आहे. सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही त्यांची भेट घालून देण्यात आली. यावरून भाजप कोणतीही कसर सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येते. काँग्रेस आघाडीत घटक पक्षांची संख्या जास्त असल्याने त्यांना पदाधिकाºयांना सांभाळताना जास्त कसरत करावी लागणार आहे.६ उमेदवारांचे अर्ज वैध, माघारीसाठी दोन दिवसनिवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सोमवारपर्यंत १० उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यापैकी ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. वैध नामांकनांमध्ये अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्टÑीय काँग्रेस), डॉ.रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी), हरिचंद्र मंगाम (बहुजन समाज पार्टी), देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया) आणि डॉ.नामदेव किरसान (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी २८ मार्चपर्यंत (दोन दिवस) मुदत आहे.नामदेव किरसान यांच्या उमेदवारीने वाढविले काँग्रेसने टेन्शनलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या चार प्रमुख उमेदवारांमध्ये डॉ.नामदेव किरसान हे एक प्रबळ दावेदार होते. त्यांनी जनसंपर्क यात्रा काढून निवडणूकपूर्व प्रचारही सुरू केला होता. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी दाखल करून बंड पुकारले आहे. त्यांची उमेदवारी निवडणुकीत कायम राहिल्यास काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे किरसान यांची पक्षाकडून समजूत काढून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले जाते, की त्यांची उमेदवारी कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक