शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; घटक पक्षांना सोबत घेण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:12 IST

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देप्रचारात महत्त्वाचे स्थान : आघाडी आणि युतीमधील पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे. त्यासाठी त्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असून हे करताना उमेदवारांना थोडी कसरतही करावी लागत आहे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण पाहता गडचिरोली-चिमूर मतदार संघात काँग्रेस आणि भाजप अशीच सरळ झाल्याचे दिसून येते. यावेळची निवडणूकही त्यासाठी अपवाद नाही. उलट यावेळी इतर पक्षीय उमेदवारांचे अस्तित्व नगण्य राहून आघाडी-युती अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आघाडी व युतीमधील घटक पक्षांचे महत्व अधिक वाढले आहे.काँग्रेस महाआघाडीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये राष्टÑवादी काँग्रेस, शेकाप, पीरिपा (कवाडे), रिपाइं (गवई) या पक्षांचे अस्तित्व जिल्ह्यात आहे. तर भाजपच्या युतीमध्ये शिवसेना आणि रिपाइं (आठवले) हे प्रमुख पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांची दोन्ही पक्षांकडून खास सरबराई केली जात आहे. बॅनर, पोस्टरवर त्यांचे फोटोही झळकत आहेत. एवढेच नाही तर स्टेजवर किंवा बैठकांमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जात आहे.कोणत्याही कारणामुळे घटक पक्षांचे पदाधिकारी दुखावले जाणार नाही, किंवा आम्हाला डावलले, महत्व दिले नाही अशी भावना त्यांच्यात येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या पदाधिकाºयांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेना सोडली असली तरी त्यांचे कुरखेडा भागातील अस्तित्व पाहून भाजपने त्यांनाही जवळ केले आहे. सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही त्यांची भेट घालून देण्यात आली. यावरून भाजप कोणतीही कसर सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येते. काँग्रेस आघाडीत घटक पक्षांची संख्या जास्त असल्याने त्यांना पदाधिकाºयांना सांभाळताना जास्त कसरत करावी लागणार आहे.६ उमेदवारांचे अर्ज वैध, माघारीसाठी दोन दिवसनिवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सोमवारपर्यंत १० उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यापैकी ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. वैध नामांकनांमध्ये अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्टÑीय काँग्रेस), डॉ.रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी), हरिचंद्र मंगाम (बहुजन समाज पार्टी), देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया) आणि डॉ.नामदेव किरसान (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी २८ मार्चपर्यंत (दोन दिवस) मुदत आहे.नामदेव किरसान यांच्या उमेदवारीने वाढविले काँग्रेसने टेन्शनलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या चार प्रमुख उमेदवारांमध्ये डॉ.नामदेव किरसान हे एक प्रबळ दावेदार होते. त्यांनी जनसंपर्क यात्रा काढून निवडणूकपूर्व प्रचारही सुरू केला होता. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी दाखल करून बंड पुकारले आहे. त्यांची उमेदवारी निवडणुकीत कायम राहिल्यास काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे किरसान यांची पक्षाकडून समजूत काढून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले जाते, की त्यांची उमेदवारी कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक