शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Lok Sabha Election 2019; घटक पक्षांना सोबत घेण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:12 IST

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देप्रचारात महत्त्वाचे स्थान : आघाडी आणि युतीमधील पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे. त्यासाठी त्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असून हे करताना उमेदवारांना थोडी कसरतही करावी लागत आहे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण पाहता गडचिरोली-चिमूर मतदार संघात काँग्रेस आणि भाजप अशीच सरळ झाल्याचे दिसून येते. यावेळची निवडणूकही त्यासाठी अपवाद नाही. उलट यावेळी इतर पक्षीय उमेदवारांचे अस्तित्व नगण्य राहून आघाडी-युती अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आघाडी व युतीमधील घटक पक्षांचे महत्व अधिक वाढले आहे.काँग्रेस महाआघाडीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये राष्टÑवादी काँग्रेस, शेकाप, पीरिपा (कवाडे), रिपाइं (गवई) या पक्षांचे अस्तित्व जिल्ह्यात आहे. तर भाजपच्या युतीमध्ये शिवसेना आणि रिपाइं (आठवले) हे प्रमुख पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांची दोन्ही पक्षांकडून खास सरबराई केली जात आहे. बॅनर, पोस्टरवर त्यांचे फोटोही झळकत आहेत. एवढेच नाही तर स्टेजवर किंवा बैठकांमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जात आहे.कोणत्याही कारणामुळे घटक पक्षांचे पदाधिकारी दुखावले जाणार नाही, किंवा आम्हाला डावलले, महत्व दिले नाही अशी भावना त्यांच्यात येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या पदाधिकाºयांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेना सोडली असली तरी त्यांचे कुरखेडा भागातील अस्तित्व पाहून भाजपने त्यांनाही जवळ केले आहे. सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही त्यांची भेट घालून देण्यात आली. यावरून भाजप कोणतीही कसर सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येते. काँग्रेस आघाडीत घटक पक्षांची संख्या जास्त असल्याने त्यांना पदाधिकाºयांना सांभाळताना जास्त कसरत करावी लागणार आहे.६ उमेदवारांचे अर्ज वैध, माघारीसाठी दोन दिवसनिवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सोमवारपर्यंत १० उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यापैकी ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. वैध नामांकनांमध्ये अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्टÑीय काँग्रेस), डॉ.रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी), हरिचंद्र मंगाम (बहुजन समाज पार्टी), देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया) आणि डॉ.नामदेव किरसान (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी २८ मार्चपर्यंत (दोन दिवस) मुदत आहे.नामदेव किरसान यांच्या उमेदवारीने वाढविले काँग्रेसने टेन्शनलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या चार प्रमुख उमेदवारांमध्ये डॉ.नामदेव किरसान हे एक प्रबळ दावेदार होते. त्यांनी जनसंपर्क यात्रा काढून निवडणूकपूर्व प्रचारही सुरू केला होता. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी दाखल करून बंड पुकारले आहे. त्यांची उमेदवारी निवडणुकीत कायम राहिल्यास काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे किरसान यांची पक्षाकडून समजूत काढून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले जाते, की त्यांची उमेदवारी कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक