शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:43 IST

एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या भेटीने आशा पल्लवित : योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला. गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी त्या दुर्लक्षित गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची ग्वाही दिल्याने कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात पडला आहे.छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेले कसनासूर हे गाव गेल्यावर्षी झालेल्या नक्षल चकमकीनंतर देशभर चर्चेत आले. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी, भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी १२ फेब्रुवारी रोजी काही अंतर पायी चालून गाव गाठले.गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. कृषी विभागामार्फत वितरित केले जाणारे शेतीचे आधुनिक साहित्य या गावकºयांना उपलब्ध करून द्यावे, वनजमिनीचे पट्टे मिळण्यासाठी वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, आरोग्य, शिक्षण या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश अधिनस्त अधिकाºयांना त्यांनी दिले. त्यामुळे आपल्या गावाच्या विकासाबाबत नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.