शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शहिदांचे जीवन देशसेवेसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:31 IST

नक्षल्यांच्या हल्ल्यात जे पोलीस जवान शहीद झाले, त्यांना जनता कधीही विसरणार नाही.

ठळक मुद्देसंजय सांगळे यांचे प्रतिपादन : नवेगाव येथे शहिदांना मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल्यांच्या हल्ल्यात जे पोलीस जवान शहीद झाले, त्यांना जनता कधीही विसरणार नाही. या शहीद पोलीस जवानांचे कार्य देशातील युवक व जनतेला देश सेवेच्या कार्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय सांगळे यांनी केले.८ आॅक्टोबर २००९ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी जंगलात नक्षल्यांनी केलेल्या घातपातात सुमारे १७ पोलीस जवान शहीद झाले होते. शहिदांच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी नवेगाव ग्रामपंचायतीच्या आवारात शहीद स्मारक बांधण्यात आले आहे. शहीद दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ठाणेदार संजय सांगळे बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच संदीप बोरकुटे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी शहीद वीर धनंजय धोटे, प्रकाश बासमवार, मिलींद रंगारी यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर जे संकट कोसळते, त्या संकटाला शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. २००९ हे वर्ष पोलिसांसाठी सर्वात घातक ठरले होते. या वर्षात सुमारे सर्वाधिक ५७ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. त्यात सर्वात मोठी घटना म्हणून आजही नोंद असलेल्या लाहेरी घातपातात १७ पोलीस जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहे.नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शासन व पोलीस विभागाने आजपर्यंत अनेक उपाय योजले असून हे उपाय परिणामकारक ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर नक्षल चळवळीला उतरती कळा आली असून लवकरच ती कायमची संपणार आहे, असे प्रतिपादन ठाणेदार सांगळे यांनी केले. यावेळी त्यांनी शहीद कुटुंबांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.