शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विद्यार्थिनींना मिळणार सशक्तीकरणाचे धडे

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

विद्यार्थिनींवर होणारे हल्ले थांबविण्याबरोबरच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचा

गडचिरोली : विद्यार्थिनींवर होणारे हल्ले थांबविण्याबरोबरच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचा लाभ जवळपास १० हजार विद्यार्थिनींना होणार आहे. विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थिनींना औपचारिक शिक्षण दिले जाते. मात्र हे शिक्षण अडीअडचणीच्या वेळी कामात येईल, याची शाश्वती नाही. मागील काही दिवसांपासून महिलांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या हल्ल्यांचा सामना युवती प्रभावीपणे करू शकत नाही. हे हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यासाठी विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी भारत जैन संघटना या स्वयंसेवी संघटनेने स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. या स्वयंसेवी संघटनेचे स्वयंसेवक विद्यापीठातील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देणार आहेत. विशेष म्हणजे भारत जैन संघटनेने हा उपक्रम नि:शुल्क स्वरूपात विद्यापीठाला उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली, चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे २३ ते २५ जानेवारी या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील जवळपास ५० विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहेत. विद्यापीठांतर्गत सुमारे २३० महाविद्यालय असून यामध्ये जवळपास १० हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणाचा लाभ सर्व विद्यार्थिनींना देण्याचा संकल्प गोंडवाणा विद्यापीठाने केला आहे. सदर प्रशिक्षण जीवनभर उपयोगी पडणार आहे. (नगर प्रतिनिधी)