शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
4
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
7
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
8
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
9
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
12
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
13
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
14
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
15
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
16
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
17
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
18
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
19
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
20
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील वाघांच्या भीतीने बिबट्यांची गावांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत.

ठळक मुद्देवाघांनी कायम केली जंगलाची हद्द : जीव वाचविण्यासाठी बिबटे गावात

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये वाघांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या बिबट्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे अंधार पडल्यानंतर गावाच्या बाहेर निघणेसुद्धा नागरिकांना कठीण झाले आहे. गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये जवळपास चार ते पाच वाघ आहेत. वाघ हा एकटाच राहणार प्राणी आहे. प्रत्येक वाघ स्वत:च्या क्षेत्राची हद्द ठरवते. या हद्दीत दुसरा वाघ किंवा बिबट येऊ शकत नाही. दुसरा वाघ आल्यास त्या दाेन वाघांमध्ये भांडण हाेऊन जाे जिंकेल ताे त्या हद्दीत राहते. हरलेल्या वाघाला ती हद्द साेडून जावे लागते. वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. दिवसभर गावाजवळ राहून रात्री गावातील पाळीव जनावरे, काेंबड्या, बकऱ्या यांच्यावर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या भीतीने अंधार पडल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत नसल्याने गावे ७ वाजतानंतर सुनसान पडत आहेत.

गावातील नागरिकांनी राहायचे कुठे?अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागून आहेत. रस्तेसुद्धा जंगलातूनच जातात. पाळीव जनावरे चारण्यासाठी जंगलात जावेच लागते. जंगलात गेल्यास वाघाचा हल्ला हाेत आहे. तर गावात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे हल्ले हाेत असल्याने गावातही राहणे आता असुरक्षित झाले आहेत. जंगलालगत असलेल्या गावांमधील नागरिक सायंकाळ हाेताच दरवाजे बंद करून राहत आहेत. वाघ व बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिनाभराच्या कालावधीत वाघांनी तीन नागरिकांचा तर बिबट्याने एकाचा बळी घेतला आहे. ज्या घरचा व्यक्ती मृत्यू पावते त्या कुटुंबाच्या वेदना त्या कुुटुंबालाच कळतात, अशी भावना पीडित कुटुंब व्यक्त करतात. त्यामुळे वन विभागाने वाघांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

चांभार्डात सलग दाेन दिवस बिबट्याचा हल्लागडचिराेली तालुक्यातील अमिर्झा परिसरात असलेल्या जंगलात वाघ आहेत. त्यामुळे बिबट्यांनी आता गावाकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी रात्री चांभार्डा टाेली येथील पाच नागरिकांच्या घरातील १० ते १२ काेंबड्या फस्त केल्या. त्यानंतर शनिवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास ग्राम पंचायतजवळ असलेल्या जाेतिबा उईके यांच्या घरच्या काेंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर काही वेळाने सूरज उईके यांच्या गाेठ्यातील वासरावर हल्ला करून जखमी केले. आठ दिवसांपूर्वी टेंभा येथे आठवडाभर बिबट्याने धुमाकुळ घातला हाेता. या सर्व घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्या