शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जंगलातील वाघांच्या भीतीने बिबट्यांची गावांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत.

ठळक मुद्देवाघांनी कायम केली जंगलाची हद्द : जीव वाचविण्यासाठी बिबटे गावात

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये वाघांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या बिबट्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे अंधार पडल्यानंतर गावाच्या बाहेर निघणेसुद्धा नागरिकांना कठीण झाले आहे. गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये जवळपास चार ते पाच वाघ आहेत. वाघ हा एकटाच राहणार प्राणी आहे. प्रत्येक वाघ स्वत:च्या क्षेत्राची हद्द ठरवते. या हद्दीत दुसरा वाघ किंवा बिबट येऊ शकत नाही. दुसरा वाघ आल्यास त्या दाेन वाघांमध्ये भांडण हाेऊन जाे जिंकेल ताे त्या हद्दीत राहते. हरलेल्या वाघाला ती हद्द साेडून जावे लागते. वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. दिवसभर गावाजवळ राहून रात्री गावातील पाळीव जनावरे, काेंबड्या, बकऱ्या यांच्यावर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या भीतीने अंधार पडल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत नसल्याने गावे ७ वाजतानंतर सुनसान पडत आहेत.

गावातील नागरिकांनी राहायचे कुठे?अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागून आहेत. रस्तेसुद्धा जंगलातूनच जातात. पाळीव जनावरे चारण्यासाठी जंगलात जावेच लागते. जंगलात गेल्यास वाघाचा हल्ला हाेत आहे. तर गावात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे हल्ले हाेत असल्याने गावातही राहणे आता असुरक्षित झाले आहेत. जंगलालगत असलेल्या गावांमधील नागरिक सायंकाळ हाेताच दरवाजे बंद करून राहत आहेत. वाघ व बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिनाभराच्या कालावधीत वाघांनी तीन नागरिकांचा तर बिबट्याने एकाचा बळी घेतला आहे. ज्या घरचा व्यक्ती मृत्यू पावते त्या कुटुंबाच्या वेदना त्या कुुटुंबालाच कळतात, अशी भावना पीडित कुटुंब व्यक्त करतात. त्यामुळे वन विभागाने वाघांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

चांभार्डात सलग दाेन दिवस बिबट्याचा हल्लागडचिराेली तालुक्यातील अमिर्झा परिसरात असलेल्या जंगलात वाघ आहेत. त्यामुळे बिबट्यांनी आता गावाकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी रात्री चांभार्डा टाेली येथील पाच नागरिकांच्या घरातील १० ते १२ काेंबड्या फस्त केल्या. त्यानंतर शनिवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास ग्राम पंचायतजवळ असलेल्या जाेतिबा उईके यांच्या घरच्या काेंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर काही वेळाने सूरज उईके यांच्या गाेठ्यातील वासरावर हल्ला करून जखमी केले. आठ दिवसांपूर्वी टेंभा येथे आठवडाभर बिबट्याने धुमाकुळ घातला हाेता. या सर्व घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्या