शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

जंगलातील वाघांच्या भीतीने बिबट्यांची गावांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत.

ठळक मुद्देवाघांनी कायम केली जंगलाची हद्द : जीव वाचविण्यासाठी बिबटे गावात

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये वाघांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या बिबट्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे अंधार पडल्यानंतर गावाच्या बाहेर निघणेसुद्धा नागरिकांना कठीण झाले आहे. गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये जवळपास चार ते पाच वाघ आहेत. वाघ हा एकटाच राहणार प्राणी आहे. प्रत्येक वाघ स्वत:च्या क्षेत्राची हद्द ठरवते. या हद्दीत दुसरा वाघ किंवा बिबट येऊ शकत नाही. दुसरा वाघ आल्यास त्या दाेन वाघांमध्ये भांडण हाेऊन जाे जिंकेल ताे त्या हद्दीत राहते. हरलेल्या वाघाला ती हद्द साेडून जावे लागते. वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. दिवसभर गावाजवळ राहून रात्री गावातील पाळीव जनावरे, काेंबड्या, बकऱ्या यांच्यावर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या भीतीने अंधार पडल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत नसल्याने गावे ७ वाजतानंतर सुनसान पडत आहेत.

गावातील नागरिकांनी राहायचे कुठे?अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागून आहेत. रस्तेसुद्धा जंगलातूनच जातात. पाळीव जनावरे चारण्यासाठी जंगलात जावेच लागते. जंगलात गेल्यास वाघाचा हल्ला हाेत आहे. तर गावात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे हल्ले हाेत असल्याने गावातही राहणे आता असुरक्षित झाले आहेत. जंगलालगत असलेल्या गावांमधील नागरिक सायंकाळ हाेताच दरवाजे बंद करून राहत आहेत. वाघ व बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिनाभराच्या कालावधीत वाघांनी तीन नागरिकांचा तर बिबट्याने एकाचा बळी घेतला आहे. ज्या घरचा व्यक्ती मृत्यू पावते त्या कुटुंबाच्या वेदना त्या कुुटुंबालाच कळतात, अशी भावना पीडित कुटुंब व्यक्त करतात. त्यामुळे वन विभागाने वाघांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

चांभार्डात सलग दाेन दिवस बिबट्याचा हल्लागडचिराेली तालुक्यातील अमिर्झा परिसरात असलेल्या जंगलात वाघ आहेत. त्यामुळे बिबट्यांनी आता गावाकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी रात्री चांभार्डा टाेली येथील पाच नागरिकांच्या घरातील १० ते १२ काेंबड्या फस्त केल्या. त्यानंतर शनिवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास ग्राम पंचायतजवळ असलेल्या जाेतिबा उईके यांच्या घरच्या काेंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर काही वेळाने सूरज उईके यांच्या गाेठ्यातील वासरावर हल्ला करून जखमी केले. आठ दिवसांपूर्वी टेंभा येथे आठवडाभर बिबट्याने धुमाकुळ घातला हाेता. या सर्व घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्या