शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

जंगलातील वाघांच्या भीतीने बिबट्यांची गावांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत.

ठळक मुद्देवाघांनी कायम केली जंगलाची हद्द : जीव वाचविण्यासाठी बिबटे गावात

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये वाघांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या बिबट्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे अंधार पडल्यानंतर गावाच्या बाहेर निघणेसुद्धा नागरिकांना कठीण झाले आहे. गडचिराेली तालुक्यातील जंगलांमध्ये जवळपास चार ते पाच वाघ आहेत. वाघ हा एकटाच राहणार प्राणी आहे. प्रत्येक वाघ स्वत:च्या क्षेत्राची हद्द ठरवते. या हद्दीत दुसरा वाघ किंवा बिबट येऊ शकत नाही. दुसरा वाघ आल्यास त्या दाेन वाघांमध्ये भांडण हाेऊन जाे जिंकेल ताे त्या हद्दीत राहते. हरलेल्या वाघाला ती हद्द साेडून जावे लागते. वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. दिवसभर गावाजवळ राहून रात्री गावातील पाळीव जनावरे, काेंबड्या, बकऱ्या यांच्यावर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या भीतीने अंधार पडल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत नसल्याने गावे ७ वाजतानंतर सुनसान पडत आहेत.

गावातील नागरिकांनी राहायचे कुठे?अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागून आहेत. रस्तेसुद्धा जंगलातूनच जातात. पाळीव जनावरे चारण्यासाठी जंगलात जावेच लागते. जंगलात गेल्यास वाघाचा हल्ला हाेत आहे. तर गावात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे हल्ले हाेत असल्याने गावातही राहणे आता असुरक्षित झाले आहेत. जंगलालगत असलेल्या गावांमधील नागरिक सायंकाळ हाेताच दरवाजे बंद करून राहत आहेत. वाघ व बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिनाभराच्या कालावधीत वाघांनी तीन नागरिकांचा तर बिबट्याने एकाचा बळी घेतला आहे. ज्या घरचा व्यक्ती मृत्यू पावते त्या कुटुंबाच्या वेदना त्या कुुटुंबालाच कळतात, अशी भावना पीडित कुटुंब व्यक्त करतात. त्यामुळे वन विभागाने वाघांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

चांभार्डात सलग दाेन दिवस बिबट्याचा हल्लागडचिराेली तालुक्यातील अमिर्झा परिसरात असलेल्या जंगलात वाघ आहेत. त्यामुळे बिबट्यांनी आता गावाकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी रात्री चांभार्डा टाेली येथील पाच नागरिकांच्या घरातील १० ते १२ काेंबड्या फस्त केल्या. त्यानंतर शनिवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास ग्राम पंचायतजवळ असलेल्या जाेतिबा उईके यांच्या घरच्या काेंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर काही वेळाने सूरज उईके यांच्या गाेठ्यातील वासरावर हल्ला करून जखमी केले. आठ दिवसांपूर्वी टेंभा येथे आठवडाभर बिबट्याने धुमाकुळ घातला हाेता. या सर्व घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्या