शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

भाडभिडी गावाला पेसा क्षेत्रातून वगळा

By admin | Updated: February 11, 2016 00:06 IST

शासनाच्या निर्देशानुसार गैरआदिवासींची संख्या ७० टक्के असल्याने भाडभिडी या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, ...

जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक : संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवकावरही आरोपगडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार गैरआदिवासींची संख्या ७० टक्के असल्याने भाडभिडी या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी संतोष मोनी किरमे यांच्यासह ८३५ ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान भाडभिडी गावच्या या ग्रामस्थांनी बुधवारी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना याबाबतचा सर्व घटनाक्रम समजावून सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने शासनाला यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नुकताच शासनाने ५१ टक्के पेक्षा जास्त गैरआदिवासींची संख्या असणाऱ्या गावांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन पेसा कायद्यातून गाव वगळण्याबाबत निर्देश दिले आहे. भाडभिडी गावात ८३५ लोकसंख्या म्हणजे ७० टक्के लोकसंख्या ही गैरआदिवासींची आहे. शासनाने चुकीने या गावात पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण आमची लोकसंख्या जास्त असताना अनेकदा सभेत गोंधळ करून आॅक्ट्रासिटी कायद्याचा धाक दाखवून आदिवासी बांधवांनी सभा तहकूब केल्या. ६ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गैरआदिवासींच्या संख्या २०० होती तर आदिवासींची संख्या १३० होती. त्यात १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले आहेत. परंतु संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी राजकीय दबावात येऊन चुकीचा ठराव लिहिला. आदिवासी संख्या ठराव रजिस्टरवर ११३ असतानाही १३२ दाखविलेली आहे. तर आमची लोकसंख्या २०० असताना १३२ दाखविली. काहींना सह्या मारू दिल्या नाही व सह्या मारलेल्या गैरआदिवासींची संख्या १३६ असताना १२८ दाखविली आहे. संवर्ग विकास अधिकारी आदिवासी जनतेच्या बाजुने ठराव राजकीय दबावात लिहित आहे, असा आरोप या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे भाडभिडी गावाला तत्काळ पेसा कायद्यातून वगळावे, अन्यथा या गावात विकास कामे होऊ देणार नाही, असा इशारा या नागरिकांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)