शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

भाडभिडी गावाला पेसा क्षेत्रातून वगळा

By admin | Updated: February 11, 2016 00:06 IST

शासनाच्या निर्देशानुसार गैरआदिवासींची संख्या ७० टक्के असल्याने भाडभिडी या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, ...

जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक : संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवकावरही आरोपगडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार गैरआदिवासींची संख्या ७० टक्के असल्याने भाडभिडी या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी संतोष मोनी किरमे यांच्यासह ८३५ ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान भाडभिडी गावच्या या ग्रामस्थांनी बुधवारी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना याबाबतचा सर्व घटनाक्रम समजावून सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने शासनाला यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नुकताच शासनाने ५१ टक्के पेक्षा जास्त गैरआदिवासींची संख्या असणाऱ्या गावांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन पेसा कायद्यातून गाव वगळण्याबाबत निर्देश दिले आहे. भाडभिडी गावात ८३५ लोकसंख्या म्हणजे ७० टक्के लोकसंख्या ही गैरआदिवासींची आहे. शासनाने चुकीने या गावात पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण आमची लोकसंख्या जास्त असताना अनेकदा सभेत गोंधळ करून आॅक्ट्रासिटी कायद्याचा धाक दाखवून आदिवासी बांधवांनी सभा तहकूब केल्या. ६ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गैरआदिवासींच्या संख्या २०० होती तर आदिवासींची संख्या १३० होती. त्यात १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले आहेत. परंतु संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी राजकीय दबावात येऊन चुकीचा ठराव लिहिला. आदिवासी संख्या ठराव रजिस्टरवर ११३ असतानाही १३२ दाखविलेली आहे. तर आमची लोकसंख्या २०० असताना १३२ दाखविली. काहींना सह्या मारू दिल्या नाही व सह्या मारलेल्या गैरआदिवासींची संख्या १३६ असताना १२८ दाखविली आहे. संवर्ग विकास अधिकारी आदिवासी जनतेच्या बाजुने ठराव राजकीय दबावात लिहित आहे, असा आरोप या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे भाडभिडी गावाला तत्काळ पेसा कायद्यातून वगळावे, अन्यथा या गावात विकास कामे होऊ देणार नाही, असा इशारा या नागरिकांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)