शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

बंधाऱ्यात संरक्षण भिंतीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:14 IST

येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे.

ठळक मुद्देनदीकाठाची होतेय हानी : सात वर्षांपूर्वी बांधला शिवकालीन बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे. सिंचन विभागाने सदर बंधाºयाला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन वैरागड येथील वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात पाणी जिरावा, या उद्देशाने शिवकालीन बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र या बंधाºयाचा मूळ उद्देश सफल झाला नाही. कारण नदीपात्रात समांतर बंधारा बांधला गेला असला तरी नदी काठाच्या दोन्ही बाजू खुल्या आहेत. नदीपात्रात खोलवर मुरलेले पाणी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने विशेषत: खालच्या बाजूने प्रवाहित होत असते. त्यामुळे या बंधाºयाचा उन्हाळ्यात नळ योजनेच्या विहिरीला उपयोग होत नाही. तसेच आजवर झालाही नाही.बंधाऱ्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने नदीपात्रात मुरलेले पाणी बाजूने निघून जाते. शिवाय पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने देखील दरवर्षी नदीचाकाठ खचत आहे. परिणामी बंधाऱ्यालगत शेती असलेल्या शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता बळावला आहे. त्यामुळे वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. एकूणच शिवकालीन बंधाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कढोलीच्या बंधाऱ्याची पुनरावृत्ती होऊ नयेकुरखेडा तालुक्याच्या कढोली येथे सती नदीपात्रात नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर असलेल्या खालील भागात चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. येथेही संरक्षण भिंतीअभावी नदी किनाऱ्याची फार मोठी हानी झाली. अशीच पुनरावृत्ती वैरागड येथील शिवकालीन बंधाºयांची होऊ नये, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.