शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बंधाऱ्यात संरक्षण भिंतीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:14 IST

येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे.

ठळक मुद्देनदीकाठाची होतेय हानी : सात वर्षांपूर्वी बांधला शिवकालीन बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे. सिंचन विभागाने सदर बंधाºयाला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन वैरागड येथील वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात पाणी जिरावा, या उद्देशाने शिवकालीन बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र या बंधाºयाचा मूळ उद्देश सफल झाला नाही. कारण नदीपात्रात समांतर बंधारा बांधला गेला असला तरी नदी काठाच्या दोन्ही बाजू खुल्या आहेत. नदीपात्रात खोलवर मुरलेले पाणी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने विशेषत: खालच्या बाजूने प्रवाहित होत असते. त्यामुळे या बंधाºयाचा उन्हाळ्यात नळ योजनेच्या विहिरीला उपयोग होत नाही. तसेच आजवर झालाही नाही.बंधाऱ्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने नदीपात्रात मुरलेले पाणी बाजूने निघून जाते. शिवाय पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने देखील दरवर्षी नदीचाकाठ खचत आहे. परिणामी बंधाऱ्यालगत शेती असलेल्या शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता बळावला आहे. त्यामुळे वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. एकूणच शिवकालीन बंधाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कढोलीच्या बंधाऱ्याची पुनरावृत्ती होऊ नयेकुरखेडा तालुक्याच्या कढोली येथे सती नदीपात्रात नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर असलेल्या खालील भागात चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. येथेही संरक्षण भिंतीअभावी नदी किनाऱ्याची फार मोठी हानी झाली. अशीच पुनरावृत्ती वैरागड येथील शिवकालीन बंधाºयांची होऊ नये, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.