शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

किर्तनातून दिला शेतीचा मंत्र

By admin | Updated: September 6, 2014 23:48 IST

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे किर्तनकार, प्रवचनकार मेळाव्याचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर

कृषी विज्ञान केंद्र : कृषी विभागाच्या योजनांची शेतकऱ्यांना दिली माहितीगडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे किर्तनकार, प्रवचनकार मेळाव्याचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी एन. के. सोनटक्के यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर भडांगे, उदयराव बोरावार, पिक संरक्षणचे विषय विशेषज्ञ डॉ. सुधीर बोरकर, नानाजी वाढई आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना एम. के. सोनटक्के यांनी राज्य व केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांने घेतला पाहिजे असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याला अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाविषयीदिली पाहिजे, जेणे करून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर वाढण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन केले. डॉ. एस. पी. लांबे यांनी किर्तनकार व प्रवचनकार हे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम करतात. त्यांच्या माध्यमातून कृषीचे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास फार मोठी मदत झाली आहे, असे मार्गदर्शन केले. चंद्रशेखर भडांगे यांनी मार्गदर्शन करतांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पिकांची योग्य वेळी लागवड करून त्यांची योग्य काळजी घेणे शक्य होत असल्याने शेती हा फायद्याचा उद्योग ठरण्यास मदत होईल. असे झाल्यास आजपर्यंत शेतीपासून दुर गेलेला युवक शेती करू लागेल. उत्तम शेती, मध्यम रोजगार व कनिष्ठ चाकरी ही म्हण सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन केले. नानाजी वाढई यांनी संतांच्या ओव्या अभंगांमधून शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन गृह विज्ञानच्या विषय विशेषज्ञ योगीता सानप तर आभार कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ एस. एस. कराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)