शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राजे, थोडे इकडेही लक्ष द्या हो !

By admin | Updated: May 28, 2017 01:15 IST

गडचिरोली जिल्ह्याचे युवा आणि उच्चशिक्षित पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे नाव घेतले की त्यांचे ‘जरा हटके’

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे युवा आणि उच्चशिक्षित पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे नाव घेतले की त्यांचे ‘जरा हटके’ व्यक्तिमत्व जिल्हावासीयांच्या नजरेसमोर येते. बालपणापासून मुंबई व नंतर उच्च शिक्षणानिमित्त विदेशात राहिल्याने गडचिरोलीच्या मातीचा गंध त्यांना फारसा आकर्षित करीत नाही. मात्र या जिल्ह्याच्या मातीशी त्यांचे ऋणानुबंध निश्चितच जुळलेले आहेत. जिल्ह्याच्या अहेरी येथील राजवाड्यात काही कौटुंबिक कार्यक्रम किंवा सुट्यांच्या निमित्ताने का असेना, अम्ब्रिशराव बालपणी निश्चितच खेळले-बागडले आहेत. पण त्यांचे मन या ठिकाणी जास्त रमले नाही. तरीही अहेरीच्या राजघराण्याची परंपरा पुढे नेणारे युवा वारसदार म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नागरिकांनी आपला कौल दिला. एरवी अनेक जिल्ह्यांचे पालकत्व स्थानिक किंवा जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना न देता लांबच्या जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या मंत्र्यांकडे आहे, पण गडचिरोलीत आर.आर.पाटील यांचा अपवाद सोडल्यास बहुतांश वेळा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी याच जिल्ह्याच्या आमदाराकडे राहिली आहे. याच परंपरेतून राज्य शासनाने राजे अम्ब्रिशराव यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. फारसा राजकीय अनुभव नसताना, पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले असताना एका युवा राज्यमंत्र्यावर गडचिरोलीसारख्या विकास कामांसाठी आव्हानात्मक व महत्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राजेंकडे देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपनेही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या असणार. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा राजेंनी किती प्रमाणात पूर्ण केल्या हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण गडचिरोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या अपेक्षांची मात्र पूर्तता होताना दिसत नाही. गेल्या अडीच वर्षात राजेंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू नागरिकांनी पाहीले. त्यांचे वागणे-बोलणे, नागरिकांशी ठेवल्या जाणाऱ्या संपर्कापासून तर झोपेतून उठण्यापर्यंत अनेक किस्से सांगितले जातात. अर्थात त्यात किती सत्यता आहे हे माहित नाही, पण ज्या गोष्टी सत्य नसतील आणि त्याची जर चर्चा होत असेल तर वेळीच त्या चर्चांना पूर्णविराम देणे गरजेचे आहे. अम्ब्रिशराव ‘राजे’ असले तरी ते आता लोकांनी निवडून दिलेले ‘लोकप्रतिनिधी’ आहेत. त्यांच्याच पक्षाचे प्रधानमंत्री तर स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात. राजेंना जिल्हावासीय ‘सेवका’च्या भूमिकेतून पाहात नसले तरी आपला ‘प्रतिनिधी’ या नात्याने त्यांच्याकडून जिल्हावासीयांच्या निश्चितच अनेक अपेक्षा आहेत. या जिल्ह्याच्या विकासकामांची भूक मोठी आहे. ती भागविण्यासोबतच नागरिकांच्या सुख-दु:खात त्यांनी सहभागी झाले पाहीजे ही नागरिकांची अपेक्षा आहे. यापूर्वी गडचिरोलीपासून हजार किलोमीटरवर राहणाऱ्या आर.आर. पाटलांनी एक आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत:हून स्वीकारले आणि गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात कधीही न झालेली कितीतरी कामे मार्गी लावली. त्यांची कारकिर्द आजही लोक एक ‘माईलस्टोन’ म्हणून आठवतात. जी लोकप्रियता आबांनी या अपरिचित जिल्ह्यात मिळविली तीच लोकप्रियता राजेंना त्यांच्या आपल्या जिल्ह्यात का मिळू नये? याचा कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे. आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे उदाहरण सर्वांच्या नजरेसमोर आहे. जी बैठक दर चार महिन्यांनी होणे अपेक्षित आहे ती गेल्या १० महिन्यांपासून झालेली नाही. समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय ती बैठक होत नाही. १० महिन्यातील काही काळ निवडणुकींच्या आचारसंहितेत गेल्यामुळे ही बैठक लांबली असली तरी आता कोणतीच आचारसंहिता नाही. पण तरीही बैठकीचा थांगपत्ता नाही. राजेंना या जिल्ह्याबद्दल जिव्हाळा नाही किंवा विकासाची तळमळ नाही, असे समजण्याचे कारण नाही. पण त्यांना आपला ‘अ‍ॅटीट्युड’ बदलावा लागेल. अगदी आर.आर.पाटील यांच्याप्रमाणे त्यांनी ग्रामीण भागात मोटरसायकलवरून फेरफटका मारणे अपेक्षित नसले तरी ‘राजे’ आणि ‘सामान्य प्रजा’ यांच्यातील अंतर कमी व्हावे, एवढी रास्त अपेक्षा मात्र निश्चित आहे.