शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजे, थोडे इकडेही लक्ष द्या हो !

By admin | Updated: May 28, 2017 01:15 IST

गडचिरोली जिल्ह्याचे युवा आणि उच्चशिक्षित पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे नाव घेतले की त्यांचे ‘जरा हटके’

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे युवा आणि उच्चशिक्षित पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे नाव घेतले की त्यांचे ‘जरा हटके’ व्यक्तिमत्व जिल्हावासीयांच्या नजरेसमोर येते. बालपणापासून मुंबई व नंतर उच्च शिक्षणानिमित्त विदेशात राहिल्याने गडचिरोलीच्या मातीचा गंध त्यांना फारसा आकर्षित करीत नाही. मात्र या जिल्ह्याच्या मातीशी त्यांचे ऋणानुबंध निश्चितच जुळलेले आहेत. जिल्ह्याच्या अहेरी येथील राजवाड्यात काही कौटुंबिक कार्यक्रम किंवा सुट्यांच्या निमित्ताने का असेना, अम्ब्रिशराव बालपणी निश्चितच खेळले-बागडले आहेत. पण त्यांचे मन या ठिकाणी जास्त रमले नाही. तरीही अहेरीच्या राजघराण्याची परंपरा पुढे नेणारे युवा वारसदार म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नागरिकांनी आपला कौल दिला. एरवी अनेक जिल्ह्यांचे पालकत्व स्थानिक किंवा जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना न देता लांबच्या जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या मंत्र्यांकडे आहे, पण गडचिरोलीत आर.आर.पाटील यांचा अपवाद सोडल्यास बहुतांश वेळा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी याच जिल्ह्याच्या आमदाराकडे राहिली आहे. याच परंपरेतून राज्य शासनाने राजे अम्ब्रिशराव यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. फारसा राजकीय अनुभव नसताना, पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले असताना एका युवा राज्यमंत्र्यावर गडचिरोलीसारख्या विकास कामांसाठी आव्हानात्मक व महत्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राजेंकडे देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपनेही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या असणार. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा राजेंनी किती प्रमाणात पूर्ण केल्या हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण गडचिरोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या अपेक्षांची मात्र पूर्तता होताना दिसत नाही. गेल्या अडीच वर्षात राजेंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू नागरिकांनी पाहीले. त्यांचे वागणे-बोलणे, नागरिकांशी ठेवल्या जाणाऱ्या संपर्कापासून तर झोपेतून उठण्यापर्यंत अनेक किस्से सांगितले जातात. अर्थात त्यात किती सत्यता आहे हे माहित नाही, पण ज्या गोष्टी सत्य नसतील आणि त्याची जर चर्चा होत असेल तर वेळीच त्या चर्चांना पूर्णविराम देणे गरजेचे आहे. अम्ब्रिशराव ‘राजे’ असले तरी ते आता लोकांनी निवडून दिलेले ‘लोकप्रतिनिधी’ आहेत. त्यांच्याच पक्षाचे प्रधानमंत्री तर स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात. राजेंना जिल्हावासीय ‘सेवका’च्या भूमिकेतून पाहात नसले तरी आपला ‘प्रतिनिधी’ या नात्याने त्यांच्याकडून जिल्हावासीयांच्या निश्चितच अनेक अपेक्षा आहेत. या जिल्ह्याच्या विकासकामांची भूक मोठी आहे. ती भागविण्यासोबतच नागरिकांच्या सुख-दु:खात त्यांनी सहभागी झाले पाहीजे ही नागरिकांची अपेक्षा आहे. यापूर्वी गडचिरोलीपासून हजार किलोमीटरवर राहणाऱ्या आर.आर. पाटलांनी एक आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत:हून स्वीकारले आणि गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात कधीही न झालेली कितीतरी कामे मार्गी लावली. त्यांची कारकिर्द आजही लोक एक ‘माईलस्टोन’ म्हणून आठवतात. जी लोकप्रियता आबांनी या अपरिचित जिल्ह्यात मिळविली तीच लोकप्रियता राजेंना त्यांच्या आपल्या जिल्ह्यात का मिळू नये? याचा कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे. आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे उदाहरण सर्वांच्या नजरेसमोर आहे. जी बैठक दर चार महिन्यांनी होणे अपेक्षित आहे ती गेल्या १० महिन्यांपासून झालेली नाही. समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय ती बैठक होत नाही. १० महिन्यातील काही काळ निवडणुकींच्या आचारसंहितेत गेल्यामुळे ही बैठक लांबली असली तरी आता कोणतीच आचारसंहिता नाही. पण तरीही बैठकीचा थांगपत्ता नाही. राजेंना या जिल्ह्याबद्दल जिव्हाळा नाही किंवा विकासाची तळमळ नाही, असे समजण्याचे कारण नाही. पण त्यांना आपला ‘अ‍ॅटीट्युड’ बदलावा लागेल. अगदी आर.आर.पाटील यांच्याप्रमाणे त्यांनी ग्रामीण भागात मोटरसायकलवरून फेरफटका मारणे अपेक्षित नसले तरी ‘राजे’ आणि ‘सामान्य प्रजा’ यांच्यातील अंतर कमी व्हावे, एवढी रास्त अपेक्षा मात्र निश्चित आहे.