शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

खोदकामाने वैरागडातील ऐतिहासिक टेकडीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:19 IST

भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देवाईल्ड लाईफ ट्रस्टचे निरीक्षण : टेकडीवरील झाडे तोडण्यास सुद्धा केली मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे.विदर्भातील ऐतिहासिक वास्तू, वने आणि वन्यप्राणी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी प्रफुल्ल भाबुलकर हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी वैरागड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांनी वैरागडचा किल्ला, भंडारेश्वर मंदिर, मंदिराची टेकडी व इतर ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. पुरातत्त्व विभागाने पाच वर्षांपूर्वी टेकडीवर असलेल्या भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीच्या खाली खोदकाम केल्याचे दिसून आले. तसेच टेकडीवर असलेली झुडूपे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणाºया जत्रेच्या वेळी तोडली जातात. त्यामुळे टेकडी पूर्णपणे बोडखी झाली आहे. टेकडीवर झाडे नसल्यास टेकडीवर पडलेले पाणी आपल्यासोबत माती वाहून घेऊन जाईल. दरवर्षी असा प्रकार होऊन मोठ्या प्रमाणात टेकडीची धूप होईल. यामुळे एक दिवस टेकडीच नष्ट होण्याचा धोका वर्तविला. त्यामुळे टेकडीवर उगविलेली लहान लहान झाडे तोडू नये, असे मत सुध्दा भाबुलकर यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले आहे.टेकडीवर खोदकाम केल्यास ऐतिहासिक वास्तूंना धोका होईल, याबाबत स्थानिक नागरिक तसेच लोकमतने अनेक वेळा पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी मानण्यास तयार नव्हते. टेकडीवर खोदकाम केले. किमान यानंतर तरी खोदकाम केले जाऊ नये, तसेच झाडांची तोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विदर्भातील जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे. जमीन घट्ट व मजबूत राहून जमिनीची होणारी धूप थांबविण्यासाठी जमिनीवर झाडे व सावली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड वाढली आहे. त्यामुळे जमिनीची धूप होऊन जमीन ठिसूळ होत चालली आहे. जंगलांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. जंगल वाचले तरच सजीवसृष्टी कायम राहिल. त्यामुळे झाडांचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.- अनिलकुमार, विदर्भ प्रभारी,वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया