शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

खोदकामाने वैरागडातील ऐतिहासिक टेकडीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:19 IST

भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देवाईल्ड लाईफ ट्रस्टचे निरीक्षण : टेकडीवरील झाडे तोडण्यास सुद्धा केली मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे.विदर्भातील ऐतिहासिक वास्तू, वने आणि वन्यप्राणी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी प्रफुल्ल भाबुलकर हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी वैरागड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांनी वैरागडचा किल्ला, भंडारेश्वर मंदिर, मंदिराची टेकडी व इतर ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. पुरातत्त्व विभागाने पाच वर्षांपूर्वी टेकडीवर असलेल्या भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीच्या खाली खोदकाम केल्याचे दिसून आले. तसेच टेकडीवर असलेली झुडूपे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणाºया जत्रेच्या वेळी तोडली जातात. त्यामुळे टेकडी पूर्णपणे बोडखी झाली आहे. टेकडीवर झाडे नसल्यास टेकडीवर पडलेले पाणी आपल्यासोबत माती वाहून घेऊन जाईल. दरवर्षी असा प्रकार होऊन मोठ्या प्रमाणात टेकडीची धूप होईल. यामुळे एक दिवस टेकडीच नष्ट होण्याचा धोका वर्तविला. त्यामुळे टेकडीवर उगविलेली लहान लहान झाडे तोडू नये, असे मत सुध्दा भाबुलकर यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले आहे.टेकडीवर खोदकाम केल्यास ऐतिहासिक वास्तूंना धोका होईल, याबाबत स्थानिक नागरिक तसेच लोकमतने अनेक वेळा पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी मानण्यास तयार नव्हते. टेकडीवर खोदकाम केले. किमान यानंतर तरी खोदकाम केले जाऊ नये, तसेच झाडांची तोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विदर्भातील जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे. जमीन घट्ट व मजबूत राहून जमिनीची होणारी धूप थांबविण्यासाठी जमिनीवर झाडे व सावली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड वाढली आहे. त्यामुळे जमिनीची धूप होऊन जमीन ठिसूळ होत चालली आहे. जंगलांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. जंगल वाचले तरच सजीवसृष्टी कायम राहिल. त्यामुळे झाडांचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.- अनिलकुमार, विदर्भ प्रभारी,वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया