शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

खोदकामाने वैरागडातील ऐतिहासिक टेकडीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:19 IST

भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देवाईल्ड लाईफ ट्रस्टचे निरीक्षण : टेकडीवरील झाडे तोडण्यास सुद्धा केली मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे.विदर्भातील ऐतिहासिक वास्तू, वने आणि वन्यप्राणी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी प्रफुल्ल भाबुलकर हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी वैरागड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांनी वैरागडचा किल्ला, भंडारेश्वर मंदिर, मंदिराची टेकडी व इतर ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. पुरातत्त्व विभागाने पाच वर्षांपूर्वी टेकडीवर असलेल्या भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीच्या खाली खोदकाम केल्याचे दिसून आले. तसेच टेकडीवर असलेली झुडूपे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणाºया जत्रेच्या वेळी तोडली जातात. त्यामुळे टेकडी पूर्णपणे बोडखी झाली आहे. टेकडीवर झाडे नसल्यास टेकडीवर पडलेले पाणी आपल्यासोबत माती वाहून घेऊन जाईल. दरवर्षी असा प्रकार होऊन मोठ्या प्रमाणात टेकडीची धूप होईल. यामुळे एक दिवस टेकडीच नष्ट होण्याचा धोका वर्तविला. त्यामुळे टेकडीवर उगविलेली लहान लहान झाडे तोडू नये, असे मत सुध्दा भाबुलकर यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले आहे.टेकडीवर खोदकाम केल्यास ऐतिहासिक वास्तूंना धोका होईल, याबाबत स्थानिक नागरिक तसेच लोकमतने अनेक वेळा पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी मानण्यास तयार नव्हते. टेकडीवर खोदकाम केले. किमान यानंतर तरी खोदकाम केले जाऊ नये, तसेच झाडांची तोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विदर्भातील जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे. जमीन घट्ट व मजबूत राहून जमिनीची होणारी धूप थांबविण्यासाठी जमिनीवर झाडे व सावली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड वाढली आहे. त्यामुळे जमिनीची धूप होऊन जमीन ठिसूळ होत चालली आहे. जंगलांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. जंगल वाचले तरच सजीवसृष्टी कायम राहिल. त्यामुळे झाडांचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.- अनिलकुमार, विदर्भ प्रभारी,वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया