शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

काेर्ला-पातागुडम मार्ग रहदारीसाठी ठरताेय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी ...

सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी येतात. काेर्ला-पातागुडम ह्या ८ किमी रस्त्याचे बांधकाम केल्यास हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६३ ला थेट जाेडला जाऊन बारमाही वाहतूक व्यवस्था निर्माण हाेऊ शकते. परंतु नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अडचणीच्या मार्गानेच नागरिकांना रहदारी करावी लागत आहे.

सिराेंचा तालुक्यातील काेपेला, पुल्लीगुडम, किष्टय्यापल्ली, काेर्ला, रमेशगुडम, कर्जेली व झिंगानूर तसेच परिसरातील गावे आदिवासीबहुल आहेत. काेर्ला ते पातागुडम हे अंतर ८ किमी आहे. सध्या येथून कच्चा रस्ता आहे. सदर मार्गाचे बांधकाम केल्यास परिसरातील गावांना पातागुडम येथे राष्ट्रीय महामार्गाला थेट जाेडता येते. त्यामुळे नागरिकांसाठी बारमाही वाहतुकीची साेय हाेईल. सध्या या भागात पक्का रस्ता नाही. तसेच रस्त्याअभावी महामंडळाची बसफेरी नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. परंतु अनेक नागरिकांकडे स्वमालकीची वाहने नसल्याने तालुका मुख्यालयी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. विविध वस्तू आणण्यासाठी भाड्याची वाहने करावी लागतात. सदर मार्गावर माेठे नाले किंवा नदी नसल्याने पक्का रस्ता झाल्यानंतर वाहतुकीस अडचण येणार नाही. कव्हरेजची समस्या आहे. त्यामुळे शासकीय रुग्णवाहिका सुद्धा येथे येत नाही. गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करताना अनेक समस्या जाणवतात. दरवर्षी अधिकारी व लाेकप्रतिनिधी काेर्ला व परिसरातील गावांना भेटी देतात. याप्रसंगी ते केवळ आश्वासन देतात, परंतु मागणी मंजूर करीत नाही. जनजागरण मेळाव्यात पाेलीस अधिकारी कच्च्या रस्त्याची समस्या जाणून घेतात. ही समस्या जिल्हा पाेलीस अधीक्षकांपर्यंत पाेहाेचली आहे, अशी माहिती आहे. दरवर्षी परिसरातील नागरिक श्रमदानातून रस्त्यालगतची झुडपे ताेडून व खड्डे बुजवून रस्ता सपाट करतात. परंतु पावसाळ्यात पुन्हा अवस्था ‘जैसे थे’ हाेते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

बाॅक्स

पावसाळ्यात तुटताे संपर्क

पावसाळ्यात काेर्ला परिसरातील गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटताे. नवसंजीवनी याेजनेंतर्गत परिसरातील गावांचा समावेश हाेत असल्याने पावसाळ्यातील चार महिन्यांचे स्वस्त धान्य एप्रिल-मे महिन्यातच लाभार्थ्यांना पाेहाेचविले जाते. अतिशय दुर्गम व जंगलव्याप्त भाग असल्याने काेर्ला-पातागुडम रस्त्याचे बांधकाम आवश्यक आहे.

===Photopath===

230421\23gad_7_23042021_30.jpg

===Caption===

श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करताना काेर्ला परिसरातील नागरिक.