शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

काेर्ला-पातागुडम मार्ग रहदारीसाठी ठरताेय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी ...

सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी येतात. काेर्ला-पातागुडम ह्या ८ किमी रस्त्याचे बांधकाम केल्यास हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६३ ला थेट जाेडला जाऊन बारमाही वाहतूक व्यवस्था निर्माण हाेऊ शकते. परंतु नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अडचणीच्या मार्गानेच नागरिकांना रहदारी करावी लागत आहे.

सिराेंचा तालुक्यातील काेपेला, पुल्लीगुडम, किष्टय्यापल्ली, काेर्ला, रमेशगुडम, कर्जेली व झिंगानूर तसेच परिसरातील गावे आदिवासीबहुल आहेत. काेर्ला ते पातागुडम हे अंतर ८ किमी आहे. सध्या येथून कच्चा रस्ता आहे. सदर मार्गाचे बांधकाम केल्यास परिसरातील गावांना पातागुडम येथे राष्ट्रीय महामार्गाला थेट जाेडता येते. त्यामुळे नागरिकांसाठी बारमाही वाहतुकीची साेय हाेईल. सध्या या भागात पक्का रस्ता नाही. तसेच रस्त्याअभावी महामंडळाची बसफेरी नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. परंतु अनेक नागरिकांकडे स्वमालकीची वाहने नसल्याने तालुका मुख्यालयी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. विविध वस्तू आणण्यासाठी भाड्याची वाहने करावी लागतात. सदर मार्गावर माेठे नाले किंवा नदी नसल्याने पक्का रस्ता झाल्यानंतर वाहतुकीस अडचण येणार नाही. कव्हरेजची समस्या आहे. त्यामुळे शासकीय रुग्णवाहिका सुद्धा येथे येत नाही. गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करताना अनेक समस्या जाणवतात. दरवर्षी अधिकारी व लाेकप्रतिनिधी काेर्ला व परिसरातील गावांना भेटी देतात. याप्रसंगी ते केवळ आश्वासन देतात, परंतु मागणी मंजूर करीत नाही. जनजागरण मेळाव्यात पाेलीस अधिकारी कच्च्या रस्त्याची समस्या जाणून घेतात. ही समस्या जिल्हा पाेलीस अधीक्षकांपर्यंत पाेहाेचली आहे, अशी माहिती आहे. दरवर्षी परिसरातील नागरिक श्रमदानातून रस्त्यालगतची झुडपे ताेडून व खड्डे बुजवून रस्ता सपाट करतात. परंतु पावसाळ्यात पुन्हा अवस्था ‘जैसे थे’ हाेते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

बाॅक्स

पावसाळ्यात तुटताे संपर्क

पावसाळ्यात काेर्ला परिसरातील गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटताे. नवसंजीवनी याेजनेंतर्गत परिसरातील गावांचा समावेश हाेत असल्याने पावसाळ्यातील चार महिन्यांचे स्वस्त धान्य एप्रिल-मे महिन्यातच लाभार्थ्यांना पाेहाेचविले जाते. अतिशय दुर्गम व जंगलव्याप्त भाग असल्याने काेर्ला-पातागुडम रस्त्याचे बांधकाम आवश्यक आहे.

===Photopath===

230421\23gad_7_23042021_30.jpg

===Caption===

श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करताना काेर्ला परिसरातील नागरिक.