शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काेर्ला-पातागुडम मार्ग रहदारीसाठी ठरताेय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी ...

सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी येतात. काेर्ला-पातागुडम ह्या ८ किमी रस्त्याचे बांधकाम केल्यास हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६३ ला थेट जाेडला जाऊन बारमाही वाहतूक व्यवस्था निर्माण हाेऊ शकते. परंतु नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अडचणीच्या मार्गानेच नागरिकांना रहदारी करावी लागत आहे.

सिराेंचा तालुक्यातील काेपेला, पुल्लीगुडम, किष्टय्यापल्ली, काेर्ला, रमेशगुडम, कर्जेली व झिंगानूर तसेच परिसरातील गावे आदिवासीबहुल आहेत. काेर्ला ते पातागुडम हे अंतर ८ किमी आहे. सध्या येथून कच्चा रस्ता आहे. सदर मार्गाचे बांधकाम केल्यास परिसरातील गावांना पातागुडम येथे राष्ट्रीय महामार्गाला थेट जाेडता येते. त्यामुळे नागरिकांसाठी बारमाही वाहतुकीची साेय हाेईल. सध्या या भागात पक्का रस्ता नाही. तसेच रस्त्याअभावी महामंडळाची बसफेरी नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. परंतु अनेक नागरिकांकडे स्वमालकीची वाहने नसल्याने तालुका मुख्यालयी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. विविध वस्तू आणण्यासाठी भाड्याची वाहने करावी लागतात. सदर मार्गावर माेठे नाले किंवा नदी नसल्याने पक्का रस्ता झाल्यानंतर वाहतुकीस अडचण येणार नाही. कव्हरेजची समस्या आहे. त्यामुळे शासकीय रुग्णवाहिका सुद्धा येथे येत नाही. गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करताना अनेक समस्या जाणवतात. दरवर्षी अधिकारी व लाेकप्रतिनिधी काेर्ला व परिसरातील गावांना भेटी देतात. याप्रसंगी ते केवळ आश्वासन देतात, परंतु मागणी मंजूर करीत नाही. जनजागरण मेळाव्यात पाेलीस अधिकारी कच्च्या रस्त्याची समस्या जाणून घेतात. ही समस्या जिल्हा पाेलीस अधीक्षकांपर्यंत पाेहाेचली आहे, अशी माहिती आहे. दरवर्षी परिसरातील नागरिक श्रमदानातून रस्त्यालगतची झुडपे ताेडून व खड्डे बुजवून रस्ता सपाट करतात. परंतु पावसाळ्यात पुन्हा अवस्था ‘जैसे थे’ हाेते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

बाॅक्स

पावसाळ्यात तुटताे संपर्क

पावसाळ्यात काेर्ला परिसरातील गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटताे. नवसंजीवनी याेजनेंतर्गत परिसरातील गावांचा समावेश हाेत असल्याने पावसाळ्यातील चार महिन्यांचे स्वस्त धान्य एप्रिल-मे महिन्यातच लाभार्थ्यांना पाेहाेचविले जाते. अतिशय दुर्गम व जंगलव्याप्त भाग असल्याने काेर्ला-पातागुडम रस्त्याचे बांधकाम आवश्यक आहे.

===Photopath===

230421\23gad_7_23042021_30.jpg

===Caption===

श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करताना काेर्ला परिसरातील नागरिक.