शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

काेरेगावात बैलबंडीवरून निघाली वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:43 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव, चाेप : पेट्राेल व डिझेलवाढीमुळे लग्नाची वरात नेण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे काेरेगाव येथील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव, चाेप : पेट्राेल व डिझेलवाढीमुळे लग्नाची वरात नेण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे काेरेगाव येथील नवरदेवाने चक्क बैलबंडीवरून लग्नाची वरात काढली. त्याची ही वरात जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे.

जवळपास २० वर्षांपूर्वी लग्नाची वरात बैलबंडीवरूनच काढली जात हाेती. जेवढ्या जास्त बैलबंड्या तेवढा ताे नवरदेव प्रतिष्ठित समजला जात हाेता. लग्नासाठी येणारे प्रत्येक कुटुंब स्वत:ची बैलबंडी, छकडा किंवा खासर पकडत हाेते. लग्न ठिकाण किती दूर आहे, यावरून लग्न वरात काढण्याचा वेळ ठरविला जात हाेता. लग्न दूरच्या गावी असेल तर रात्रभर प्रवास करून वरात लग्न ठिकाणी सकाळी पाेहाेचत हाेती. मात्र चारचाकी वाहने भाड्याने उपलब्ध हाेण्यास सुरुवात झाल्यानंतर बैलबंडीची वरात ही संकल्पना मागे पडली. आता तर ती लुप्तच झाली आहे. प्रत्येक नवरदेव स्वत:ची वरात वाहनांनीच लग्नगावी पाेहाेचवतो. यासाठी हजाराे रुपये खर्च हाेतात. लग्नानंतर नवरदेवाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. काेरेगाव येथील नवरदेवाने मात्र या खर्चाला फाटा देत चक्क बैलबंडीवरून वरात काढली.

काेरेगाव येथील अमाेल दादाजी राऊत या नवरदेवाचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नांदेड येथील प्रांजली सुधाकर आंबडारे हिच्यासाेबत रविवारी काेरेगाव येथेच पार पडला. लग्नस्थळापर्यंत वाजतगाजत नवरदेवाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. यादरम्यान मित्रपरिवार नाचतो, तर नवदेव चारचाकी वाहनात किंवा घाेड्यावर बसून राहतो. यासाठी एखादे वाहन हमखास भाड्याने घेतले जाते. मात्र काेरेगावच्या नवरदेवाने काेणतेही वाहन भाड्याने न घेता बैलबंडीवरून वरात काढली. त्याची वरात परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. डिझेल व पेट्राेलच्या किमती वाढल्याने वाहनाच्या भाड्याचे दरही वाढले आहेत. या खर्चाला फाटा देत अमाेलने इतर नवरदेवांसमाेर नवीन आदर्श ठेवला आहे.

बाॅक्स

जुन्या आठवणींना उजाळा

अमाेलने बैलांवर झूल टाकली तसेच बैलबंडीही सजविण्यात आली हाेती. बैलबंडीवर शेतकरी असे लिहिण्यात आले हाेते. सजलेली बैलबंडी बघून अनेकांना जुन्या काळातील लग्नांची आठवण झाली. लग्नातील अनावश्यक खर्चांना आळा घालण्यासाठी लग्नांची जुनीच पद्धत चांगली हाेती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.