शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

कमलसिंह हिडामी नक्षलवादी नाहीत

By admin | Updated: August 29, 2015 00:08 IST

पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले आमचे वडील कमलसिंह हिडामी हे नक्षलवादी नाहीत हो... असा आर्त टाहो कमलसिंहच्या मुलांनी फोडला असून, ...

मुलगी व मुलाचा दावा : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रारगडचिरोली : पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले आमचे वडील कमलसिंह हिडामी हे नक्षलवादी नाहीत हो... असा आर्त टाहो कमलसिंहच्या मुलांनी फोडला असून, त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.मंगळवारी २५ आॅगस्ट रोजी विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षल शोध अभियान राबवीत असताना संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत कमलसिंह हिडामी जखमी झाला. नंतर पोलिसांनीच त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यानंतर कमलसिंह हा एरिया रक्षक दलाचा सदस्य असून, तो बोंडे येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. परंतु आता कमलसिंहच्या मुलांनी आपले वडील नक्षलवादी नव्हते, त्यांचा नक्षल्यांशी कुठलाही संबंध नव्हता, असे निवेदन दिल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.कमलसिंहचा मुलगा निलाराम हा कोरची येथील आयटीआयमध्ये कारपेंटर ट्रेडचे शिक्षण घेत असून, मुलगी राधिका नवव्या वर्गात शिकत आहे. निलाराम व राधिकाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कोरची तालुक्यातील बोंडे येथील रहिवासी असून, वडील, आई व दोन बहीण-भाऊ असे चार जणांचे कुटुंब आहे. आमचे वडील कमलसिंह हिडामी हे व्यवसायाने बेलदार असून, गेल्या सहा महिन्यांपासून ते मयालघाट येथील पोलीस पाटील कमेनसिंह परसो यांच्या घराचे बांधकाम करीत आहेत. २५ आॅगस्ट रोजी ४ वाजताच्या सुमारास कमलसिंह हिडामी हे मयालघाट येथील काम आटोपून गावाकडे परत येण्यास निघाले असता, वाटेतील जंगलात सी-६० पथकाच्या जवानांनी त्यांच्यावर गोळया झाडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आम्हाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही कोरची पोलीस ठाण्यात गेलो असता, तुमच्या वडिलांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आम्ही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलो. परंतु तेथे तैनात पोलिसांनी आम्हाला आमच्या वडिलांना भेटू दिले नाही. यावरुन पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते, असेही निलाराम व राधिका हिडामी यांनी म्हटले आहे.आमचे वडील निरपराध असून, ते नक्षल्यांच्या संपर्कात नव्हते. त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर गोळया का झाडल्या, असा सवाल हिडामी भावडांनी केला असून, दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)