शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

काेल्हापुरी बंधारे ठरणार चापलवाडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात कन्नमवार जलाशय असूनसुद्धा धरण परिसरातील १४ गावांच्या शेतकऱ्यांना सिंचनाची कोणतीही सोय नसल्याने अनेकदा ओरड होत ...

चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात कन्नमवार जलाशय असूनसुद्धा धरण परिसरातील १४ गावांच्या शेतकऱ्यांना सिंचनाची कोणतीही सोय नसल्याने अनेकदा ओरड होत होती. सिंचन विभागाच्या वतीने अनेकदा सर्वेक्षण करण्यात आले. धरणाचे पाणी परिसरातील गावांना देणे शक्य नसल्याने अखेर प्रशासनाने जलसंधारण विभागाच्या मार्फत शेतशिवारातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्याचा प्रकल्प जलसंधारण विभागामार्फत हाती घेण्यात आला.

शेती उपयोगी पाण्याच्या वापराबरोबरच भूमिगत जलपातळीत वाढ होण्यासाठी सदर कोल्हापुरी उपयुक्त ठरणार आहेत. कृत्रिम विहीर व बोरवेलमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होण्याची सोय होणार आहे. त्यात गुरेढोरे वन्यप्राणी यांनाही या बंधाऱ्याचा लाभ होणार आहे. चापलवाडा, मछली, गांधीनगर, वरुर, माडेआमगाव नाल्याजवळसुद्धा दर्जेदार साखळी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येत आहे. पाणी साठवण्यासाठी बंधारा परिसरातील नाल्याचे खोलीकरण करण्याची कामे ही प्रगतीपथावर आहेत. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. ३ मे रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. यु. शेंडे, जलसंधारण अधिकारी सलमान पठाण यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक शेतकऱ्यांच्या शंका व तक्रारीचे निराकरण गैरसमज दूर केले.