शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

न्यायालयीन निर्णयाचा जि. प. निवडणुकीवर परिणाम होणार नाही

By admin | Updated: January 21, 2017 01:54 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी,

अशोक नेते यांचा दावा : पत्रकार परिषदेत दिली माहिती गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, असा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. आमदार डॉ. होळी यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याचवेळी विरोधकांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकृत केला. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविली. मोठ्या फरकाने त्यांनी निवडणूक जिंकली. मात्र ज्यावेळी डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यावेळी त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता. ही बाब पुढे करून विरोधकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने आ. डॉ. होळी यांच्या विरोधात निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल ही तांत्रिक बाब आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण व भाजप मान ठेवून तो निर्णय मान्य केला आहे. आ. डॉ. होळी यांच्या बाजुने संपूर्ण भाजप उभा आहे. पुढील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांवर आ. डॉ. होळी यांच्या विरोधात दिलेल्या निर्णयाचा काहीच परिणाम पडणार नाही, असा दावा खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. पत्रकार परिषदेला आ. डॉ. देवराव होळी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, स्वीकृत सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नंदू काबरा, रेखा डोळस आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) गैरव्यवहारातून आपण निर्दोष- होळी शकुंतला मेमोरियल ट्रस्टच्या विरोधात गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले होते. मात्र या आरोपांमधून आपली निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. निवडणुकीपूर्वी १९ आॅगस्ट २०१३ रोजी मी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यावर मला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, असे स्पष्ट कारण नमूद केले होते. त्यामुळे माझ्या विरोधकांनी माझा राजीनामा स्वीकृत होऊ नये, यासाठी प्रयत्न केला. शकुंतला मेमोरियल ट्रस्ट व इतर लोकांविरोधात २६ सप्टेंबर २०१३ रोजी पोलिसात खोटी तक्रार दाखल केली व राजीनामा मंजुरीस अडचणी आणल्या. त्यामुळे राजीनामा स्वीकृत होण्यास विलंब झाला. कायद्यानुसार राजीनामा दिल्याच्या तारखेनंतर एका महिन्यात राजीनामा मंजूर झाला असता तर आपल्यावर ही अडचण आली नसती, अशी माहिती आ. डॉ. होळी यांनी दिली.