शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

न्यायालयीन निर्णयाचा जि. प. निवडणुकीवर परिणाम होणार नाही

By admin | Updated: January 21, 2017 01:54 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी,

अशोक नेते यांचा दावा : पत्रकार परिषदेत दिली माहिती गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, असा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. आमदार डॉ. होळी यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याचवेळी विरोधकांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकृत केला. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविली. मोठ्या फरकाने त्यांनी निवडणूक जिंकली. मात्र ज्यावेळी डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यावेळी त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता. ही बाब पुढे करून विरोधकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने आ. डॉ. होळी यांच्या विरोधात निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल ही तांत्रिक बाब आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण व भाजप मान ठेवून तो निर्णय मान्य केला आहे. आ. डॉ. होळी यांच्या बाजुने संपूर्ण भाजप उभा आहे. पुढील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांवर आ. डॉ. होळी यांच्या विरोधात दिलेल्या निर्णयाचा काहीच परिणाम पडणार नाही, असा दावा खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. पत्रकार परिषदेला आ. डॉ. देवराव होळी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, स्वीकृत सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नंदू काबरा, रेखा डोळस आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) गैरव्यवहारातून आपण निर्दोष- होळी शकुंतला मेमोरियल ट्रस्टच्या विरोधात गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले होते. मात्र या आरोपांमधून आपली निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. निवडणुकीपूर्वी १९ आॅगस्ट २०१३ रोजी मी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यावर मला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, असे स्पष्ट कारण नमूद केले होते. त्यामुळे माझ्या विरोधकांनी माझा राजीनामा स्वीकृत होऊ नये, यासाठी प्रयत्न केला. शकुंतला मेमोरियल ट्रस्ट व इतर लोकांविरोधात २६ सप्टेंबर २०१३ रोजी पोलिसात खोटी तक्रार दाखल केली व राजीनामा मंजुरीस अडचणी आणल्या. त्यामुळे राजीनामा स्वीकृत होण्यास विलंब झाला. कायद्यानुसार राजीनामा दिल्याच्या तारखेनंतर एका महिन्यात राजीनामा मंजूर झाला असता तर आपल्यावर ही अडचण आली नसती, अशी माहिती आ. डॉ. होळी यांनी दिली.