शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राजोलीच्या अर्धवट पुलाने प्रवास जिकरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 01:43 IST

तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने पूल बांधण्यात आला.

प्रशासन सुस्त : विद्यार्थ्यांसह नागरिकांना कापावे लागते अधिकचे १५ किमी अंतर; गावकऱ्यांच्या नशिबी कायम नरकयातनाच धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने पूल बांधण्यात आला. मात्र दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते. राजोलीवासीयांच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. धानोरा तालुक्यातील राजोली हे २५० कुटुंबाची वस्ती असलेले गाव आहे. या गावाला कठाणी नदीने अर्ध्या भागात वेढा दिला आहे. येथील नागरिकांना कठाणी नदीपात्रातूनच गावाबाहेर पडावे लागते. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन पाच वर्षांपूर्वी राजोली नजीक कठाणी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नदीचे पात्र विस्तारले. याशिवाय रपटा वाहून गेला व पूल अर्धवट राहिला . त्यामुळे पावसाळ्यात राजोली गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने सदर पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रखडले. गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे राजोलीवासीयांनी दुरावस्थेत असलेल्या या पुलाची श्रमदानातून दुरूस्ती केली. तसेच कच्चा रपटा तयार केला. त्यामुळे राजोलीवासीयांना आवागमनाची सुविधा झाली. मात्र त्यानंतर पुन्हा रपटा खचल्याने व नदीचे पात्र विस्तारल्याने यंदाही येण्याजाण्याची समस्या ऐरणीवर आली आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना नवरगाव- सोडेमार्गे धानोरा येथे १५ किमी अंतर अधिकचे कापून पोहोचावे लागते. (तालुका प्रतिनिधी) रस्ता मंजूर;मात्र पुलाबाबत हालचाली नाही मुख्यमंत्री सडक योजनेतून राजोली गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता मंजूर करण्यात आला आहे. यासाठी निधीची तरतुदही करण्यात आली आहे. मात्र अर्धवट स्थितीत असलेला पूल नव्याने उभारण्यासंदर्भात प्रशासनाच्या हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे राजोली वासीयांची निराशा झाली आहे. दरवर्षी चार महिन्यांची शाळा बुडते राजोली येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या पलीकडच्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना धानोरा, चातगाव, गिरोला येथे जावे लागते. राजोली येथील ५० वर विद्यार्थी इयत्ता आठवीपासून बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी आयटीआय तसेच संगणक शिक्षण घेत आहेत. पावसाळ्यात कठाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे राजोली गावानजीक कठाणी नदीवर असलेल्या अर्धवट पुलामुळे मार्ग बंद होतो. संततधार पावसामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात पुलाअभावी या गावातील ५० वर विद्यार्थ्यांची चार महिन्यांची शाळा बुडते. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो.