शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

जारावंडीत शाळा बंद आंदोलन

By admin | Updated: August 4, 2014 23:44 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे.

एटापल्ली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे. धान्य सडलेले असतांनाही धान्यांची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. महामंडळाने सडलेले धान्य त्वरित उचलावे, म्हणून गावकऱ्यांनी शाळा बंद आंदोलनास सुरूवात केली आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावावी म्हणून मागील तीन वर्षांपासून नागरिकांनी वारंवार आंदोलन केले. प्रशासनाकडे धान्याची उचल करण्याबाबत वारंवार निवेदनही सादर केले. परंतु प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सडलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, हे कारण समोर करून जारावंडी येथील नागरिकांनी १ आॅगस्टपासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला होता. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप ठोकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. जारावंडी येथे २०१०-११ ला १ हजार क्विंटल धान खरेदी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात आली. परंतु सदर धान्य गोदामात न ठेवता शाळेच्या आवारात ठेवण्यात आले. त्यामुळे सडलेल्या धान्याची दुर्गंधी परिसरात पसरत होती. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. अनेक विद्यार्थी धानाच्या दुर्गंधीमुळे आजारीही पडले. त्यामुळे अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणेच बंद केले. शाळेजवळच अंगणवाडी, ग्रामपंचायत, वनविभाग निवासस्थान तसेच खासगी दुकान व आठवडी बाजारपेठ आहे. त्यामुळे यांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. धान्याची तीन दिवसात उचल न झाल्यास ग्रामपंचायमार्फत धान उचलून फेकले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहील असा ठराव ग्रामसभा बोलवून नुकताच पारित करण्यात आला. शाळा बंद आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळेतील १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सडलेल्या धानाची त्वरित करावी, अशी मागणी जारावंडीचे सरपंच देवनाथ सोनुले, पदाधिकारी शालिकराम गेडाम, दत्तूजी मडावी, दिलीप दास, सुरेश तलांडे, दिनेश माठे, देविदास मोहुर्ले, शरिफ पठाण, सुधाकर टेकाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)