शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

जारावंडीत शाळा बंद आंदोलन

By admin | Updated: August 4, 2014 23:44 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे.

एटापल्ली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे. धान्य सडलेले असतांनाही धान्यांची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. महामंडळाने सडलेले धान्य त्वरित उचलावे, म्हणून गावकऱ्यांनी शाळा बंद आंदोलनास सुरूवात केली आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावावी म्हणून मागील तीन वर्षांपासून नागरिकांनी वारंवार आंदोलन केले. प्रशासनाकडे धान्याची उचल करण्याबाबत वारंवार निवेदनही सादर केले. परंतु प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सडलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, हे कारण समोर करून जारावंडी येथील नागरिकांनी १ आॅगस्टपासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला होता. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप ठोकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. जारावंडी येथे २०१०-११ ला १ हजार क्विंटल धान खरेदी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात आली. परंतु सदर धान्य गोदामात न ठेवता शाळेच्या आवारात ठेवण्यात आले. त्यामुळे सडलेल्या धान्याची दुर्गंधी परिसरात पसरत होती. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. अनेक विद्यार्थी धानाच्या दुर्गंधीमुळे आजारीही पडले. त्यामुळे अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणेच बंद केले. शाळेजवळच अंगणवाडी, ग्रामपंचायत, वनविभाग निवासस्थान तसेच खासगी दुकान व आठवडी बाजारपेठ आहे. त्यामुळे यांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. धान्याची तीन दिवसात उचल न झाल्यास ग्रामपंचायमार्फत धान उचलून फेकले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहील असा ठराव ग्रामसभा बोलवून नुकताच पारित करण्यात आला. शाळा बंद आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळेतील १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सडलेल्या धानाची त्वरित करावी, अशी मागणी जारावंडीचे सरपंच देवनाथ सोनुले, पदाधिकारी शालिकराम गेडाम, दत्तूजी मडावी, दिलीप दास, सुरेश तलांडे, दिनेश माठे, देविदास मोहुर्ले, शरिफ पठाण, सुधाकर टेकाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)