शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

अहेरीतील पाणीपुरवठा सुरू

By admin | Updated: May 4, 2017 01:30 IST

अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो.

पाणीटंचाई टळली : पोकलँड मशीनने पाण्याचा प्रवाह वळविला अहेरी : अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. प्राणहिता नदीची धार आटल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद पडला होता. मात्र प्रशासनाने पोकलँड मशीन लावून पाण्याचा प्रवाह नदीच्या दिशेने वळविल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. नदीमधील पाण्याच्या टाकीजवळील धार आटल्याने इनटेक वेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून अहेरी शहरातील पाणीपुरवठा बंद झाला होता. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची ओरड प्रचंड प्रमाणात वाढली होती. हातपंप व विहिरींवर पाणी भरणाऱ्या महिलांची गर्दी उसळली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अगदी दुसऱ्याच दिवशी पोकलँड मशीनच्या सहाय्याने पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधून पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला आहे. सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे बल्लापूर येथील उपविभागीय अधिकारी सुशील पाटील, कार्यकारी अभियंता संजय वाघ यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता अजय कोतपल्लीवार व तुशार सोनटक्के, अरूण कोंडलेकर यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)