शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सिंचन योजनेत विहिरी ऐवजी बोअरवेल द्या

By admin | Updated: October 8, 2015 01:02 IST

शासन दरवर्षी ठरविलेल्या उद्दिष्टानुसार सिंचनाची सुविधा देण्याच्या उद्देशाने १०० टक्के अनुदानात विहीर मंजूर करीत आहे.

गडचिरोली : शासन दरवर्षी ठरविलेल्या उद्दिष्टानुसार सिंचनाची सुविधा देण्याच्या उद्देशाने १०० टक्के अनुदानात विहीर मंजूर करीत आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात शेतात ३० ते ३३ फूट विहिरीचे खोदकाम करूनही पाहिजे त्याप्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा उपयोगच शेतीच्या सिंचनासाठी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिंचन विहिरीच्या योजनेत बदल करून त्याऐवजी बोअरवेल शेतात करून देण्याची योजना गडचिरोली जिल्ह्यात राबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये कुठेही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे निसर्गावर शेती अवलंबून आहे. पर्यावरणाच्या बदलामुळे दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाणही भूगर्भातून कमी होत आहे. काही वर्षी तर तलावात सुध्दा पाणी राहत नाही. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासाठी मारामार होत असते. शेतकऱ्याच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होतो.ही परिस्थिती बदलविण्याकरिता शासन शेतकऱ्यांना दीड एकराच्या वरती आराजी पाहून कोरडवाहू शेतात १०० टक्के अनुदानावर शेतात विहिरीचे खोदाकाम करण्याकरिता ३ लाख रूपये मंजूर करून विहिरीचे बांधकाम करण्याची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सिमेंट, गिट्टी, लोखंड, रेती याचा वापर करून शेतकरी शेतात ३० ते ३५ फूट विहिरीचे खोदकाम पूर्ण करतो. परंतु ३० ते ३५ फूट विहीर खोदकाम करूनही त्यावर इंजीन, इलेक्ट्रीक, पंप, बसवून सुरू केले. पाणी घेतले तर ३० मिनिटेही वीज पंप चालत नाही व शेती सिंचनासाठी पाणीही पुरत नाही. त्यामुळे सरकारने सिंचन विहिरीची योजना सुरू करूनही शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होतांना दिसत नाही, असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात आहे.