शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पाचे काम रखडले

By admin | Updated: February 26, 2015 01:44 IST

वनसंवर्धन कायद्यामुळे १९७८ मध्ये मंजूर झालेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातील दोन ते तीन प्रकल्प राज्य शासनाने गुंडाळले.

गडचिरोली : वनसंवर्धन कायद्यामुळे १९७८ मध्ये मंजूर झालेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातील दोन ते तीन प्रकल्प राज्य शासनाने गुंडाळले. तर उपसा योजना निर्माण करू असे आश्वासन आघाडी सरकारने दिले होते. चिचडोह बॅरेज वगळता, एकाही योजनेचे काम त्यांना सुरू करता आले नाही. त्यामुळे सिंचन अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर संपूर्ण राज्यात सिंचन क्षेत्राचा विकास करण्यात आला. मात्र गडचिरोली जिल्हा याला अपवाद ठरला आहे. या जिल्ह्यात सिंचनावर फारच कमी निधी खर्च करण्यात आला. वन कायद्यामुळे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले. २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. गडचिरोली संयुक्त चंद्रपूर जिल्ह्यात असताना १९७८ मध्ये तुलतुली, कारवाफा, चेन्ना आदी मोठ्या प्रकल्पांना मंजूर देण्यात आली होती. व या सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. १९८० मध्ये केंद्र सरकारने वनसंवर्धन कायदा मंजूर केला व या सिंचन प्रकल्पाचे काम थांबले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचन विकासासाठी एकदाही निधी दिला नाही. त्यामुळे गेल्या ३० ते ३५ वर्षात गडचिरोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढले नाही. २००५ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा येंगलखेडा व कोसरी या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यावेळी तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही ३० वर्षात गडचिरोलीचा सिंचन अनुशेष प्रचंड प्रमाणात कायम राहिला. ही कबुली दिली होती. केवळ चिचडोह बॅरेज या एकाच सिंचन योजनेचे काम सध्या सुरू आहे. पालकमंत्र्यांसह शासनही अनुशेष दूर करू असे आश्वासन आताही या सरकारच्या काळात देण्यात येत आहे. सिंचन प्रकल्प न झाल्यामुळे जिल्ह्याच्या १२ पैकी जवळजवळ १० तालुक्यात शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या भरवशावरच शेती करावी लागत आहे व एक पीक घेऊन बाकी कालावधीत ठप्प बसावे लागत आहे व रोजगारासाठी शेजारच्या आंध्रप्रदेश छत्तीसगडमध्ये जावे लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)