शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

सिंचन प्रकल्पाचे काम रखडले

By admin | Updated: February 26, 2015 01:44 IST

वनसंवर्धन कायद्यामुळे १९७८ मध्ये मंजूर झालेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातील दोन ते तीन प्रकल्प राज्य शासनाने गुंडाळले.

गडचिरोली : वनसंवर्धन कायद्यामुळे १९७८ मध्ये मंजूर झालेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातील दोन ते तीन प्रकल्प राज्य शासनाने गुंडाळले. तर उपसा योजना निर्माण करू असे आश्वासन आघाडी सरकारने दिले होते. चिचडोह बॅरेज वगळता, एकाही योजनेचे काम त्यांना सुरू करता आले नाही. त्यामुळे सिंचन अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर संपूर्ण राज्यात सिंचन क्षेत्राचा विकास करण्यात आला. मात्र गडचिरोली जिल्हा याला अपवाद ठरला आहे. या जिल्ह्यात सिंचनावर फारच कमी निधी खर्च करण्यात आला. वन कायद्यामुळे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले. २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. गडचिरोली संयुक्त चंद्रपूर जिल्ह्यात असताना १९७८ मध्ये तुलतुली, कारवाफा, चेन्ना आदी मोठ्या प्रकल्पांना मंजूर देण्यात आली होती. व या सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. १९८० मध्ये केंद्र सरकारने वनसंवर्धन कायदा मंजूर केला व या सिंचन प्रकल्पाचे काम थांबले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचन विकासासाठी एकदाही निधी दिला नाही. त्यामुळे गेल्या ३० ते ३५ वर्षात गडचिरोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढले नाही. २००५ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा येंगलखेडा व कोसरी या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यावेळी तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही ३० वर्षात गडचिरोलीचा सिंचन अनुशेष प्रचंड प्रमाणात कायम राहिला. ही कबुली दिली होती. केवळ चिचडोह बॅरेज या एकाच सिंचन योजनेचे काम सध्या सुरू आहे. पालकमंत्र्यांसह शासनही अनुशेष दूर करू असे आश्वासन आताही या सरकारच्या काळात देण्यात येत आहे. सिंचन प्रकल्प न झाल्यामुळे जिल्ह्याच्या १२ पैकी जवळजवळ १० तालुक्यात शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या भरवशावरच शेती करावी लागत आहे व एक पीक घेऊन बाकी कालावधीत ठप्प बसावे लागत आहे व रोजगारासाठी शेजारच्या आंध्रप्रदेश छत्तीसगडमध्ये जावे लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)