शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

सिंचन प्रकल्पाचे काम रखडले

By admin | Updated: February 26, 2015 01:44 IST

वनसंवर्धन कायद्यामुळे १९७८ मध्ये मंजूर झालेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातील दोन ते तीन प्रकल्प राज्य शासनाने गुंडाळले.

गडचिरोली : वनसंवर्धन कायद्यामुळे १९७८ मध्ये मंजूर झालेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातील दोन ते तीन प्रकल्प राज्य शासनाने गुंडाळले. तर उपसा योजना निर्माण करू असे आश्वासन आघाडी सरकारने दिले होते. चिचडोह बॅरेज वगळता, एकाही योजनेचे काम त्यांना सुरू करता आले नाही. त्यामुळे सिंचन अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर संपूर्ण राज्यात सिंचन क्षेत्राचा विकास करण्यात आला. मात्र गडचिरोली जिल्हा याला अपवाद ठरला आहे. या जिल्ह्यात सिंचनावर फारच कमी निधी खर्च करण्यात आला. वन कायद्यामुळे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले. २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. गडचिरोली संयुक्त चंद्रपूर जिल्ह्यात असताना १९७८ मध्ये तुलतुली, कारवाफा, चेन्ना आदी मोठ्या प्रकल्पांना मंजूर देण्यात आली होती. व या सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. १९८० मध्ये केंद्र सरकारने वनसंवर्धन कायदा मंजूर केला व या सिंचन प्रकल्पाचे काम थांबले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचन विकासासाठी एकदाही निधी दिला नाही. त्यामुळे गेल्या ३० ते ३५ वर्षात गडचिरोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढले नाही. २००५ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा येंगलखेडा व कोसरी या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यावेळी तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही ३० वर्षात गडचिरोलीचा सिंचन अनुशेष प्रचंड प्रमाणात कायम राहिला. ही कबुली दिली होती. केवळ चिचडोह बॅरेज या एकाच सिंचन योजनेचे काम सध्या सुरू आहे. पालकमंत्र्यांसह शासनही अनुशेष दूर करू असे आश्वासन आताही या सरकारच्या काळात देण्यात येत आहे. सिंचन प्रकल्प न झाल्यामुळे जिल्ह्याच्या १२ पैकी जवळजवळ १० तालुक्यात शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या भरवशावरच शेती करावी लागत आहे व एक पीक घेऊन बाकी कालावधीत ठप्प बसावे लागत आहे व रोजगारासाठी शेजारच्या आंध्रप्रदेश छत्तीसगडमध्ये जावे लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)