शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आरमोरी बर्डी परिसरात अनियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:37 IST

तीव्र आंदोलन करण्याचा कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांचा इशारा(फोटो) आरमोरी : येथील बर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून ...

तीव्र आंदोलन करण्याचा कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांचा इशारा(फोटो)

आरमोरी : येथील बर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळयोजनेचे पाणी नियमित येत नसल्याने पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी व कुणाल भरणे यांनी दिला आहे.

आरमोरी नगरपरिषदचे योग्य नियोजन नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बर्डी परिसरातील नागरिकांना बसत आहेत. बर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक दिवसआड येणारे पाणी आता तीन चार दिवसापर्यंत सोडले जात नाही. नळाद्वारे केवळ १५ ते २० मिनिटेच पाणीपुरवठा केला जाताे. नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बर्डी परिसरातील पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा कोरोनाच्या काळात पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशारा काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी व कुणाल भरणे यांनी प्रशासनाला दिला आहे.

बाॅक्स

प्रस्तावित नळयाेजना प्रस्ताव धूळखात

आरमाेरी येथील तत्कालीन नगरपंचायतने २०१४ पासून प्रस्तावित केलेली वाढीव नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न केल्यामुळे अजूनही सदर याेजनेचा प्रस्ताव धूळखात पडलेला आहे. त्याची अंमलबजावणी झाली असती तर आरमोरीवासीयांना मुबलक पाणीपुरवठा झाला असता. परंतु आरमोरी शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना अंमलात आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाचे प्रयत्न करणे गरजेचे होते, मात्र ढिसाळ प्रशासन व नियोजनशून्य कारभारामुळेच शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

बाॅक्स

काही हातपंप नादुरुस्त तर काही काेरडे

बर्डी परिसरातील काही वाॅर्डात हातपंप असूनही गेल्या अनेक महिन्यांपासून ते नादुरुस्त आहेत. काही हातपंप सुरू असले तरी त्यांना पाणी येत नसल्याने तेही निरुपयोगी ठरत आहेत. काही दिवसांपासून पाणी टंचाईची गंभीर स्थिती बर्डी परिसरातील निर्माण झाली असतानाही नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बर्डी परिसरात नागरिकांमध्ये तीव्र राेष आहे.