शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
2
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
3
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
4
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
5
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
6
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
7
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
8
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
9
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
10
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
11
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
12
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
13
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
14
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
15
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
16
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
17
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
18
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
19
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
20
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे

गडचिरोलीत लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने २५ तलावांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 10:09 IST

Gadchiroli news सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव निर्मितीचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांत २५ तलावांचे काम पूर्णत्वास गेले आहे.

ठळक मुद्देदुर्गम भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा होणार

रमेश मारगोनवार

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव निर्मितीचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांत २५ तलावांचे काम पूर्णत्वास गेले आहे. या तलावांत साचणाऱ्या पाण्यातून आता तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर विसंबून न राहता रब्बी हंगामातही पीक घेता येणार आहे.

भामरागड तालुका हा अनेक वर्षांपूर्वी राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र, या तालुक्यातील विविध समस्या अजूनही आ वासून उभ्या आहेत. इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा या बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचनाची सुविधा नाही. वनक्षेत्र आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या नद्या असूनही त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करणे आतापर्यंत जमले नाही. परिणामी आजही तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते.

ही परिस्थिती दूर करण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी शेतकऱ्यांच्या सहभागातून काही गावांमध्ये तलाव निर्माण करण्याचे काम २०१६ पासून हाती घेतले. भामरागड तालुक्यातील जिंजगावातून तलाव निर्मितीचे काम सुरू केले. अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली येथील तलावाचे काम नुकतेच पूर्ण झाले. आतापर्यंत विविध गावांत असे २५ तलाव तयार करण्यात यश आले.

पुढेही शक्य ती मदत करणार

याबाबत बोलताना अनिकेत आमटे यांनी सांगितले, भामरागड तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचन सुविधेअभावी शेतीचा विकास झाला. ही बाब लक्षात घेऊन तलाव निर्मितीचा संकल्प केला. या तलावांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे सोयीचे होईल. कोरड्या दुष्काळापासून शेती वाचविता येईल. तसेच त्या तलावात मासेमारीही करता येईल. एवढेच नाही तर जमिनीतील पाणी पातळी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक गावकऱ्यांनी आमच्या गावात तलाव निर्माण करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढेही शक्य होईल तेवढी मदत शेतकऱ्यांसाठी करणार, असे अनिकेत यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी