शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जलस्तर वाढविण्यासाठी शाळांची लगबग

By admin | Updated: December 26, 2015 01:35 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना गावालगत असणाऱ्या नदी, ओढा, नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती ...

वनराई बंधाऱ्यांची निर्मिती : महात्मा गांधी शाळा, देसाईगंज व किसान विद्यालय, कोरेगावचा पुढाकारदेसाईगंज/ कोरेगाव (चोप) : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना गावालगत असणाऱ्या नदी, ओढा, नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी भिडल्या असून अनेक ठिकाणी वनराई बंधारे बांधून पाणी अडविले जात आहे. त्यामुळे जलस्तर वाढण्यास मदत होत आहे. देसाईगंज येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या हरितसेना विभागाच्या वतीने शनिवारी गाढवी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सिमेंटच्या रिकाम्या बॅगमध्ये रेती भरून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. या बंधाऱ्यामुळे लगतच्या शेतांना तसेच गुराढोरांना पाण्याची सोय होणार आहे. सदर उपक्रम प्राचार्य टाकरखेडे, उपप्राचार्य उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ए. एस. करडे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी हरितसेना प्रमुख बुद्धे, डांगे, ठवकर, तुंडुलवार, मारूडवार व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कोरेगाव येथील किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व ग्राम पंचायत कोरेगाव, मित्रांगण सार्वजनिक बहुउद्देशीय गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गाढवी नदीघाटावर वनराई बंधारा बांधण्यात आला. प्राचार्य व्ही. एस. मुंगमोडे यांनी वनराई बंधाऱ्यामुळे होणारा पाण्याचा वापर वापर व महत्त्व पटवून दिले. यावेळी सरपंच ममिता आळे, उपसरपंच जगदीश सहारे, राऊत, भावे, अरूण राजगिरे, सुधाकर दोनाडकर, जगदीश केळझरकर, जयंत मेश्राम, महानंदा राऊत, सुमित्रा कन्नाके, लता कन्नाके, सुरेश पर्वतकर, संजय वाघाडे, नरेश नेवारे, रमेश मेश्राम, पुरूषोत्तम भरणे व नागरिक हजर होते. (वार्ताहर)