शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

राशन दुकानदारांचे कमिशन वाढवा

By admin | Updated: October 30, 2014 22:51 IST

गरिबांना अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून अत्यल्प कमिशन दिले जात आहे. मागील १५ वर्षांपासून प्रतिक्विंटल ७० रूपये नफा स्वस्त धान्य दुकानदारांना दिला जात आहे.

आरमोरी : गरिबांना अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून अत्यल्प कमिशन दिले जात आहे. मागील १५ वर्षांपासून प्रतिक्विंटल ७० रूपये नफा स्वस्त धान्य दुकानदारांना दिला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची वाताहत होत आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसीलदार दिलीप फुलसंगे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागील १५ वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने स्वस्त धान्याचा वाहतूक खर्चही वाढला आहे. महागाईचा फटका स्वस्त धान्य दुकानदारांनाही बसत आहे. साखर वाटपावरही कमिशन दिले जात नाही. अनेकदा साखर वाटपात तूट होते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनाच तोटा सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. साखरेवर कमिशन देण्यात यावे, ट्रॅक्टर भाड्याची रक्कम वाढवून देण्यात यावी, दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अन्नधान्याची घट मंजूर करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादाजी माकडे, सचिव अनिल किरमे, सहसचिव रवींद्र निंबेकार, नादीरभाई लालानी, झलके, कोपुलवार, रामटेके, गिरडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)