शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू व्यवसायाला वचक बसणार

By admin | Updated: April 24, 2017 01:11 IST

राज्यात पहिल्यांदाच दारूची वाहतूक करणारे वाहन सरकार जमा करण्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी केली.

पोलिसांचा दावा : वाहतुकीचे वाहन सरकारजमा करण्याची कारवाईगडचिरोली : राज्यात पहिल्यांदाच दारूची वाहतूक करणारे वाहन सरकार जमा करण्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी केली. सदर कारवाईमुळे दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीसाठी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल व अवैध दारूच्या व्यवसायाला प्रतिबंध बसेल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९९२ मध्ये लोक आंदोलन उभे झाल्याने दारूबंदी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारू विक्रीचा व्यवसायही वाढीला लागला होता. १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारू व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याला सुरूवात झाली. तसेच मुंबई दारूबंदी कायद्यातही बदल करण्यात आले. त्यामुळे अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांनी या धंद्याला रामराम ठोकला. त्यानंतरही लहान व मोठ्या गावांमध्ये अवैध दारूचा व्यवसाय सुरूच आहे. दारूची वाहतूक करण्यासाठी आलिशान गाड्यांचा वापर अलिकडे वाढलेला होता. जिल्ह्यातून व इतर राज्यातून जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. अवैध दारूचा व्यवसाय करणारे लोक संबंधित वाहन सोडून तीच वाहने पुन्हा पुन्हा दारूच्या वाहतुकीसाठी वापरत होते. मात्र पोलीस प्रशासनाने ११ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रकुमार मनोहर गुंडावार यांचे मालकीचे वाहन सरकारजमा करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे आता भविष्यात अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या पांढरपेशी गुन्हेगार, पपेट गुन्हेगार यांना मोठा आर्थिक फटका बसेल. परिणामी अवैध दारूच्या धंद्याला प्रभाविपणे प्रतिबंध होईल, असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे. वाहन सरकार जमा करण्याच्या निर्णयाचे समाजाच्या विविध स्तरातून स्वागत होत आहे. मात्र ही कारवाई निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दारूची तस्करी, दारू जप्त, साहित्य जप्त, दारू तस्करी करणाऱ्यावर गुन्हा आदी बाबी नित्याच्या झाल्या होत्या. मात्र दारूची तस्करी करणारे वाहन सरकार जमा करण्याची घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. यापुढे वन विभागाप्रमाणे लाकडांसोबत जसे वाहने देखील जप्त केली जातात त्याचप्रमाणे दारू सोबत वाहने ही जप्त करण्यात आली तर नक्कीच दारू तस्करीवर फार मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल यात शंका नाही. ही कार्यवाही सर्वच दारू तस्करी करणाऱ्या वाहनांवर होत राहावी, व पुढेही सुरूच राहावी. अन्यथा पोलीस खात्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन नेहमीचाच होऊन बसेल. पोलीस विभागाच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.- विलास निंबोरकर, सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती