शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

गोरजाई घाटातून रेतीचे अवैध उत्खनन

By admin | Updated: October 16, 2015 01:56 IST

महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे आरमोरी तालुक्यातील वैरागड भागातील गोरजाई घाटावर गेल्या १०-१२ दिवसांपासून रेतीचा क्षमतेपेक्षा अधिक उपसा होत असून अवैध उत्खनन सुरू आहे.

वैरागड : महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे आरमोरी तालुक्यातील वैरागड भागातील गोरजाई घाटावर गेल्या १०-१२ दिवसांपासून रेतीचा क्षमतेपेक्षा अधिक उपसा होत असून अवैध उत्खनन सुरू आहे. पर्यावरण विषयक परवानगीच्या अटीचे काटेकोर पालन करणे व या अटींचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र गोरजाई घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननामुळे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येते. यंदा गोरजाई रेतीघाट लिलावासाठी खुला करण्यात आला. आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील चार नदी घाटांचा मंजूर रेती घाटांच्या यादीत समावेश आहे. खोब्रागडी नदीवरील वैरागड, वैरागड ते करपडा मार्ग, वैरागड-मानापूर घाट, वैरागड ते विहीरगाव आदी रेती घाटांचा समावेश आहे. ग्राम पंचायतींनी गोरजाई डोहघाटाचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा, कारण या घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असून चोरट्या मार्गाने काही लोक येथे अवैध रेतीचा उपसा करीत आहेत. प्रत्येक रेती घाटातून उत्खननासाठी देण्यात येणारी जागा ठरवून दिल्या जाते. मात्र संबंधित रेती कंत्राटदार क्षमतेपेक्षा अधिक उपसा करीत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे. रेती व इतर गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार झाली असली तरी क्षमतेपेक्षा अधिक उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केव्हा होणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारीत आहेत. याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)