शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

गेल्या १० ते १२ वर्षांपासून गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक वॉर्डात रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेचे नियंत्रणच नाही : स्वच्छता अभियान व सांडपाणी व्यवस्थापनाचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १० ते १२ वर्षांपासून गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक वॉर्डात रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शहरातील कन्नमवार वॉर्ड, विवेकानंनगर, गोकुलनगर, स्नेहनगर, रामनगर, सर्वोदय वॉर्ड आदीसह बहुतांश वॉर्डात कृषक, अकृषक, येलो बेल्ट, अतिक्रमीत आदी सर्व प्रकारचे मिळून जवळपास ४०० पेक्षा अधिक रिकामे भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून तसेच कायम आहेत. नगर पालिकेकडे केवळ अकृषक प्लाटाची नोंद आहे. मात्र त्यावर टॅक्सही लावण्यात आला नाही.सदर भूखंड हे खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात या भूखंडात दरवर्षी पाणी साचते. यावर्षीही अशीच परिस्थिती आहे. गडचिरोली शहरात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्याने रिकाम्या भूखंडात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्याचा लगतच्या घरांना व कुटुंबांना त्रास होत आहे.पावसाळा वगळता इतर ऋतुमध्ये मोकड्या भूखंडावर लगतचे नागरिक घरातील कचरा बिनधास्तपणे टाकतात. आता पावसाचे पाणी रिकाम्या भूखंडावर साचले असल्याने कचरा तरंगत असल्याचे दिसून येत आहे. रिकाम्या भूखंडाची जागा खोलगट असल्याने येथून दुसरीकडे पाण्याची निचरा होत नाही. बहुतांश भूखंड मालक गडचिरोली शहरात राहत नसल्याने नगर पालिकेला सदर प्लॉटमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची नालीही खोदता येत नाही. त्यामुळे रिकाम्या भूखंडापासून सांडपाण्याची तयार झालेल्या या समस्येला मार्गी लावण्यासाठी पालिकेसमोरही पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.रिकाम्या भूखंडात पाणी साचून डबक्या स्वरूप प्राप्त झाल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पावसाळ्यात विविध आजाराची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिकाम्या भूखंडाची ही समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.रिकाम्या भूखंड मालकांवर कराची आकारणी करा; सतीश विधाते यांची मागणीशहरातील विवेकानंदनगर, कन्नमवारनगरसह बऱ्याच वॉर्डात शेकडोच्या संख्येने रिकामे-मोकळे भूखंड आहेत. सदर भूखंडाची देखभाल करण्याकडे संबंधित मालकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सदर रिकाम्या भूखंडात आता पावसाचे पाणी साचले आहे. भूखंडात साचलेल्या पाण्याचा त्रास सभोवतालच्या घरांना होत आहे. यासंदर्भातील तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने आपण प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन पाहणी केली. मात्र रिकाम्या भूखंडावर कच्च्या स्वरूपाची नाली मारून पाण्याची विल्हेवाटही करणे शक्य नाही. याचे कारण रिकामे भूखंड नेमक्या कुणाच्या मालकीचे आहे हे लगतच्या कुटुंबांनाही माहित नाही. एकूणच सदर विषय गंभीर आहे. रिकाम्या भूखंडाची ही समस्या मार्गी लावून पावसाचे व बाथरूमच्या सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा होण्यासाठी कार्यवाही व्हावी, त्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील सर्व रिकाम्या भूखंड मालकांवर कराची आकारणी करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश विधाते यांनी केली आहे.सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाशहराच्या स्नेहनगरातील स्टेडियम परिसरात अनेक रिकामे भूखंड आहेत. काही भूखंडात मोठमोठी झाडे असून घाणीचे साम्राज्य आहे. वाढलेली झाडे, झुडूपे व वाचलेच्या पाण्यामुळे साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून लगतच्या नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेली मोठमोठी झाडे, झुडूपे तोडून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस