शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आष्टी तालुक्याच्या निर्मितीसाठी आणखी किती प्रतीक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:38 IST

आष्टी : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेले आणि जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी हे जवळपास आठ हजार लोकसंख्या असलेले गाव ...

आष्टी : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेले आणि जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी हे जवळपास आठ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून आष्टीचे अंतर बरेच असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण होते. त्यामुळे आष्टी हा स्वतंत्र तालुका घोषित करावा, अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून केली जात आहे. मात्र, या मागणीच्या पूर्ततेसाठी अजूनही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला नाही.

२६ ऑगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. आज जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे झाली, मात्र आष्टी परिसरातील नागरिकांची गैरसोय संपलेली नाही. कित्येकदा तालुक्याच्या निर्मितीबाबत मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सर्वपक्षीय आंदोलने करण्यात आली, मात्र आष्टीवासीयांची घोर निराशाच झाली. काही वर्षाआधी आष्टी हा तालुका होणार म्हणून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. सर्वकाही तयार असताना वेळेवर मुलचेरा तालुका घोषित झाला. त्यामुळे आष्टीवासीयांच्या पदरी पुन्हा निराशा आली. सर्व सोयींनी युक्त असलेल्या आष्टी गावाला तालुक्याचा दर्जा देऊन परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.

(बॉक्स)

५२ गावांतील नागरिकांची गैरसोय

चामोर्शी तालुका विस्ताराने फार मोठा आहे. या तालुक्यात नऊ जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. आष्टी येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. तसेच ग्रामीण बॅंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तीन वरिष्ठ महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, चार हायस्कूल, महसूल मंडळ, पोलीस स्टेशन, मोठी बाजारपेठ असून, आष्टीला लागून ५२ गावे आहेत. या गावांतील नागरिकांना चामोर्शी येथे तालुक्याच्या ठिकाणी ४० किमी अंतरावर प्रत्येक कामासाठी जावे लागत असल्याने अडचणीचे होते. गोरगरिबांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.