शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

रानतलावात अतिक्रमण करुन बांधली घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:33 IST

फाेटाे.... आरमाेरी येथील रानतलावात अशाप्रकारे अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे. आरमोरी : शहरानजीक असलेल्या रानतलावात काही लाेकांनी अतिक्रमण करुन ...

फाेटाे.... आरमाेरी येथील रानतलावात अशाप्रकारे अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे.

आरमोरी : शहरानजीक असलेल्या रानतलावात काही लाेकांनी अतिक्रमण करुन घरांचे बांधकाम केले आहे. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष हाेत आहे. अतिक्रमणामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता कमी झाली आहे. भविष्यात तलावातील बहुतांश जागा गिळंकृत केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आरमाेरी येथील रानतलावातील भुमापन क्र. १२७६ व १२८४ मध्ये ३.९६ हे.आर. व ०.७१ (हे.आर) क्षेत्र असून माजी मालगुजारी तलाव (रानतलाव) जि.प. अंतर्गत येताे. या तलावाच्या पोटात काही लोकांनी अतिक्रमण करून त्या जागेवर नगर परिषदेची परवानगी न घेता बांधकाम सुद्धा सुरू केले आहे. रान तलाव हे शहराच्या मध्यभागी असल्याने अतिशय महत्त्वाचे आहे. भविष्यात सौंदर्यीकरण व्हावे ही आरमोरीकरांची इच्छा आहे. दिवसेंदिवस या तलावाची व्याप्ती कमी कमी होत आहे. पावसाळ्यात पाण्याचा साठा वाढून तलावाची संरक्षक पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलावातील पाण्याच्या प्रवाहाने खालील भागात असलेल्या घरामध्ये, गावात पाणी शिरुन हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या तलावातील पाणी उन्हाळ्यात पाळीव जनावरांना पिण्यासाठी तसेच जनतेच्या इतर कामाकरिता उपयोगी येत होते. विशेष म्हणजे, या तलावात ढिवर-भोई समाज पारंपरिक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आल्यास या समाजावर बेराेजगारीचे संकट काेसळू शकते. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व अबाधित राहावे, अशी मागणी नागरिकांची आहे.

बाॅक्स

पालकमंत्र्यांकडे केली तक्रार

आरमाेरी येथील रानतलावात अतिक्रमण करुन घरांचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धाेक्यात येत आहे. मात्र प्रशासन यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने अतिक्रमण फाेफावण्याचा धाेका आहे. ही गंभीर बाब ओळखून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य अमाेल मारकवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीद्वारे त्यांनी तलावातील अतिक्रमण हटविण्याची मागणीही केली आहे.