शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

उंच वाहनांमुळे भूयारी पुलावर हाेते वाहतुकीची काेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST

देसाईगंज : येथील रेल्वे फाटक सातत्याने बंद असते. त्यामुळे रेल्वे विभागाने पर्यायी तोडगा म्हणून भूमिगत पुलाची निर्मिती करुन वाहतूक ...

देसाईगंज : येथील रेल्वे फाटक सातत्याने बंद असते. त्यामुळे रेल्वे विभागाने पर्यायी तोडगा म्हणून भूमिगत पुलाची निर्मिती करुन वाहतूक सुलभ करुन दिली. परंतु या मार्गावरुन जास्त उंचीची अवजड वाहने अनेकवेळा बोगद्यात अडकून वाहतुकीचा खोळंबा हाेते. त्यामुळे बाेगद्यामधून अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी हाेत आहे.

देसाईगंज शहर हे दोन भागात विभागले गेले आहे. पूर्वी वडसा शहराच्या पूर्व भागातून पश्चिमेकडे ये जा करण्यासाठी रेल्वेफाटकाशिवाय पर्याय नव्हता. त्यातच रेल्वेची वाहतूक वाढल्याने दिवसातून अनेकवेळा फाटक बंदचा फटका आवागमन करणाऱ्या वाहतूक वाहनांना व पादचारी लोकांना बसत होता. देसाईगंज रेल्वे समिती व नगरपरिषद यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर भुयारी पुलाची निर्मिती केली. भुयारी पुलाच्या दोन्ही बाजुला विशिष्ट उंचीचे ओव्हरहेड लोखंडी रोधक लावलेले आहेत. त्यावर ३.५५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे अशा वाहनांसाठी बायपास रोडचा पर्याय दिला आहे. तरीही टिप्पर, रोड रोलर, डांबर प्लांटचे गरम डांबर भरलेले ट्रक, विटा, मुरुम, गिट्टी भरलेले ट्रॅक्टर हे याच मार्गाने जातात. ही वाहने भुयारी पुलाच्या दोन्ही बाजुला पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या मार्गावरच चढून तर कधी विटाने भरलेले अवजड ट्रॅक्टर रिव्हर्स येऊन पलटी मारल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परवा भुयारी पुलाच्या अगदी तोंडावर रोडरोलर डिझेल संपल्याने मध्येच उभा राहिला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती. त्यामुळे ३.५० मीटरपेक्षा कमी उंचीचे पण अवजड वाहनात मोडतात अशा वाहनांना या भुयारी पुलातून जाण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी पादचारी व वाहनधारकांनी केली आहे.