शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

आराेग्य कर्मचारी ठरू शकतात काेराेना पसरविण्यासाठी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST

यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी काेराेना वाॅर्डात काम करणाऱ्या डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची काही दिवस सलग नेमणूक केली जात हाेती. ...

यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी काेराेना वाॅर्डात काम करणाऱ्या डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची काही दिवस सलग नेमणूक केली जात हाेती. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन ठेवले जात हाेते. काेराेनाची भीती असल्याने हे कर्मचारी व डाॅक्टर घरीही जात नव्हते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांना इतर वाॅर्डांमध्ये नेमणूक दिली जात हाेती. या कालावधीत ते घरी जात हाेते. त्यामुळे त्यांचे कुटुंंब काेराेनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहत हाेते.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र काेराेना वाॅर्डात काम करणारे आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेना वाॅर्डातून थेट घरीच जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काेराेनाचा धाेका हाेण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबाचा संसर्ग इतर सामान्य नागरिकांना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना थेट घरी जाण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.

काेट

मुला-बाळांची काळजी वाटते; पण काय करणार

काही निवडकच डाॅक्टरांना काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. रिलिव्हर मिळत नसल्याने काम करणारे डाॅक्टर थकले आहेत. काेराेनाचा संसर्ग आपल्या कुटुंबाला हाेऊ नये ही काळजी आपल्यालाही आहे. मात्र, दुसरीकडे नाेकरी करायची आहे. त्यामुळे माहीत असूनही काेराेना वाॅर्डातून घरी गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया काही डाॅक्टरांनी दिली आहे.

जीव धाेक्यात घालून काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. बऱ्याचवेळ पीपीई किट घालून राहावे लागते. उन्हाळा सुरू झाल्याने आता उकाडा वाढला आहे. त्यामुळे पीपीई किट घालून रुग्णालयात काम करणे कठीण हाेते. घामाच्या धारा वाहत राहतात. घरी गेल्याशिवाय आलेला त्राण कमी करणे शक्य नाही. घरी गेल्यानंतर आंघाेळ केली जाते, अशी प्रतिक्रिया काही आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

काेट

घरच्यांची धाकधूक वाढली

रुग्णालयातून थेट घरी गेल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मनात काही प्रमाणात धाकधूक कायम राहते. यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी पुरेशी काळजी घेऊनही काही आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेनाबाधित झाले. त्यांच्या कुटुंबियांनाही काेराेनाचा संसर्ग झाला हाेता. या आठवणी ताज्या हाेताच मनात भीती निर्माण हाेते, अशी प्रतिक्रिया आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबियांनी दिली आहे.

काेट

आराेग्य कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था एएनएम हाेस्टेल व डाॅक्टरांची व्यवस्था जवाहर भवन विश्रामगृहात करण्यात आली आहे. तरीही काही कर्मचारी रुग्णालयातून थेट घरी जात असतील तर ते चुकीचे आहे. प्रत्येकाने याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

डाॅ. अनिल रुडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिराेली.