शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

आराेग्य कर्मचारी ठरू शकतात काेराेना पसरविण्यासाठी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST

यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी काेराेना वाॅर्डात काम करणाऱ्या डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची काही दिवस सलग नेमणूक केली जात हाेती. ...

यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी काेराेना वाॅर्डात काम करणाऱ्या डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची काही दिवस सलग नेमणूक केली जात हाेती. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन ठेवले जात हाेते. काेराेनाची भीती असल्याने हे कर्मचारी व डाॅक्टर घरीही जात नव्हते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांना इतर वाॅर्डांमध्ये नेमणूक दिली जात हाेती. या कालावधीत ते घरी जात हाेते. त्यामुळे त्यांचे कुटुंंब काेराेनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहत हाेते.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र काेराेना वाॅर्डात काम करणारे आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेना वाॅर्डातून थेट घरीच जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काेराेनाचा धाेका हाेण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबाचा संसर्ग इतर सामान्य नागरिकांना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना थेट घरी जाण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.

काेट

मुला-बाळांची काळजी वाटते; पण काय करणार

काही निवडकच डाॅक्टरांना काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. रिलिव्हर मिळत नसल्याने काम करणारे डाॅक्टर थकले आहेत. काेराेनाचा संसर्ग आपल्या कुटुंबाला हाेऊ नये ही काळजी आपल्यालाही आहे. मात्र, दुसरीकडे नाेकरी करायची आहे. त्यामुळे माहीत असूनही काेराेना वाॅर्डातून घरी गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया काही डाॅक्टरांनी दिली आहे.

जीव धाेक्यात घालून काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. बऱ्याचवेळ पीपीई किट घालून राहावे लागते. उन्हाळा सुरू झाल्याने आता उकाडा वाढला आहे. त्यामुळे पीपीई किट घालून रुग्णालयात काम करणे कठीण हाेते. घामाच्या धारा वाहत राहतात. घरी गेल्याशिवाय आलेला त्राण कमी करणे शक्य नाही. घरी गेल्यानंतर आंघाेळ केली जाते, अशी प्रतिक्रिया काही आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

काेट

घरच्यांची धाकधूक वाढली

रुग्णालयातून थेट घरी गेल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मनात काही प्रमाणात धाकधूक कायम राहते. यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी पुरेशी काळजी घेऊनही काही आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेनाबाधित झाले. त्यांच्या कुटुंबियांनाही काेराेनाचा संसर्ग झाला हाेता. या आठवणी ताज्या हाेताच मनात भीती निर्माण हाेते, अशी प्रतिक्रिया आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबियांनी दिली आहे.

काेट

आराेग्य कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था एएनएम हाेस्टेल व डाॅक्टरांची व्यवस्था जवाहर भवन विश्रामगृहात करण्यात आली आहे. तरीही काही कर्मचारी रुग्णालयातून थेट घरी जात असतील तर ते चुकीचे आहे. प्रत्येकाने याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

डाॅ. अनिल रुडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिराेली.