शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आराेग्य कर्मचारी ठरू शकतात काेराेना पसरविण्यासाठी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST

यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी काेराेना वाॅर्डात काम करणाऱ्या डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची काही दिवस सलग नेमणूक केली जात हाेती. ...

यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी काेराेना वाॅर्डात काम करणाऱ्या डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची काही दिवस सलग नेमणूक केली जात हाेती. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन ठेवले जात हाेते. काेराेनाची भीती असल्याने हे कर्मचारी व डाॅक्टर घरीही जात नव्हते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांना इतर वाॅर्डांमध्ये नेमणूक दिली जात हाेती. या कालावधीत ते घरी जात हाेते. त्यामुळे त्यांचे कुटुंंब काेराेनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहत हाेते.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र काेराेना वाॅर्डात काम करणारे आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेना वाॅर्डातून थेट घरीच जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काेराेनाचा धाेका हाेण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबाचा संसर्ग इतर सामान्य नागरिकांना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना थेट घरी जाण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.

काेट

मुला-बाळांची काळजी वाटते; पण काय करणार

काही निवडकच डाॅक्टरांना काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. रिलिव्हर मिळत नसल्याने काम करणारे डाॅक्टर थकले आहेत. काेराेनाचा संसर्ग आपल्या कुटुंबाला हाेऊ नये ही काळजी आपल्यालाही आहे. मात्र, दुसरीकडे नाेकरी करायची आहे. त्यामुळे माहीत असूनही काेराेना वाॅर्डातून घरी गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया काही डाॅक्टरांनी दिली आहे.

जीव धाेक्यात घालून काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. बऱ्याचवेळ पीपीई किट घालून राहावे लागते. उन्हाळा सुरू झाल्याने आता उकाडा वाढला आहे. त्यामुळे पीपीई किट घालून रुग्णालयात काम करणे कठीण हाेते. घामाच्या धारा वाहत राहतात. घरी गेल्याशिवाय आलेला त्राण कमी करणे शक्य नाही. घरी गेल्यानंतर आंघाेळ केली जाते, अशी प्रतिक्रिया काही आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

काेट

घरच्यांची धाकधूक वाढली

रुग्णालयातून थेट घरी गेल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मनात काही प्रमाणात धाकधूक कायम राहते. यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी पुरेशी काळजी घेऊनही काही आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेनाबाधित झाले. त्यांच्या कुटुंबियांनाही काेराेनाचा संसर्ग झाला हाेता. या आठवणी ताज्या हाेताच मनात भीती निर्माण हाेते, अशी प्रतिक्रिया आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबियांनी दिली आहे.

काेट

आराेग्य कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था एएनएम हाेस्टेल व डाॅक्टरांची व्यवस्था जवाहर भवन विश्रामगृहात करण्यात आली आहे. तरीही काही कर्मचारी रुग्णालयातून थेट घरी जात असतील तर ते चुकीचे आहे. प्रत्येकाने याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

डाॅ. अनिल रुडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिराेली.