शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

संपाने आरोग्य व्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:26 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.

ठळक मुद्दे२ एप्रिलच्या परिपत्रकाने खळबळ : ११ पासून एनआरएचएम कर्मचारी कामबंद आंदोलनावर

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.५० खाटांची क्षमता असलेल्या कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचा भार पूर्णपणे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरच होता. आंतररुग्ण विभागातही मोजके नियमित कर्मचारी वगळता अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच अधिक भार आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांना यापुढे त्यांच्या कामाच्या मूल्यांकनावरूनच मानधनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांची वागणूक व काम योग्य न आढळल्यास त्याला पगारवाढ दिली जाणार नाही, असे परिपत्रक आरोग्य विभागाने काढले आहे. त्यामुळे एनआरएचएम कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एनआरएचएम कर्मचाºयांच्या कामबंद आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्था ठप्प पडली आहे.संपामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यावर पोहोचली. त्यामुळे रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत माहिती होताच माजी जिल्हा परिषद सभापती निरांजनी चंदेल यांनी रुग्णालयाला भेट दिली. आंदोलकांशी चर्चा केली. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. शासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.या आहेत आंदोलकांच्या मागण्याराष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास १८ हजार पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्पशा मानधनावर कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. २ एप्रिल २०१८ रोजी एनयूएचएमचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी एनआरएचएम कर्मचाºयांना यापुढे फक्त सहा महिन्यांचीच पुनर्नियुक्ती देण्याबाबत पत्र काढले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करून मानधनवाढ दिली जाणार आहे. याबाबीला एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा विरोध असून ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.